“एक देश, एक निवडणूक” ही संकल्पना भारतीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे आणि विकासकामांना गती देणे आहे. एक देश, एक निवडणूक हे धोरण जर राबवलं गेलं तर त्याचे काही फायदे आणि तोटे आहेत ते नेमके कोणते हे आपण आता बघुयात.
फायदे
-खर्च कमी करणे: एकाच वेळी निवडणुका झाल्यास निवडणूक खर्च कमी होईल. हे सरकारसाठी आणि पक्षांसाठी फायदेशीर ठरेल.
विकासकामांची गती: सततच्या निवडणुकांमुळे विकासकामे थांबतात. एकाच वेळी निवडणुका झाल्यास, सरकारला कामे पूर्ण करण्यास अधिक वेळ मिळेल.
-राजकीय स्थिरता: एकत्रित निवडणुका झाल्यास सरकार स्थिर राहण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे दीर्घकालीन धोरणे राबवता येतील.
तोटे
-राजकीय विविधता कमी होणे: विविध राज्यांमध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागतो. एकाच वेळी निवडणुका झाल्यास स्थानिक मुद्दे मागे पडू शकतात.
-सामाजिक असंतोष: काही राज्यांमध्ये स्थानिक राजकीय वातावरण भिन्न असू शकते, त्यामुळे सर्वत्र समान धोरण राबवणे कठीण होईल.
-संविधानिक आव्हाने: या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी संविधानात बदल आवश्यक आहे, त्यामुळे याला विरोधकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
एक देश, एक निवडणूक ही संकल्पना अनेक फायदे आणि तोटे घेऊन येते. या प्रक्रियेत भारतीय राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडवण्याची क्षमता आहे, परंतु यासाठी सर्व पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. आगामी काळात या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होईल त्यावेळी आपल्याला या धोरणाचं काय होतंय ते कळेलच. तोपर्यंत तुम्हाला या One Nation One Election बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.