Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES

शिंदे-आंबेडकर युतीची घोषणा; महाराष्ट्रात नवे समीकरण!

शिंदे-आंबेडकर युतीची घोषणा; महाराष्ट्रात नवे समीकरण!

मुंबई – महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेसोबत युतीची घोषणा केली.हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. दरम्यान आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा आहे.

त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल..
“आगामी निवडणुकांसाठी आनंदराज आंबेडकर आणि रिपब्लिकन सेनेसोबत हातमिळवणी करण्याचा आम्हाला अभिमान आहे.” ही भागीदारी सामायिक मूल्यांवर आणि सामाजिक न्यायाच्या वचनबद्धतेवर बांधली गेली आहे. “समावेशक विकास आणि उपेक्षितांसाठी एक मजबूत आवाज सुनिश्चित करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करू,” तसेच शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत. या सेना रस्त्यावर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सेना आहेत. बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं एकदम चांगलं जमेल असे शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबईतील दलित आणि मराठी मतांचे समीकरण साधण्यासाठी ही युती झाल्याचे म्हटले जात आहे.

कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती..
शिंदे हे वेगळे नेते असून ते सर्वांना सोबत घेऊन जातात. कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती करत आहोत. कुठलीही अडी न ठेवता त्यांनी देखील पुढे जायचं ठरवलं.आंबेडकरी कार्यकर्त्याना सत्तेत सहभागी करून घेण्याचा शब्द शिंदे यांनी दिला आहे, त्यामुळेच ही युती होत आहे. अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.

About The Author

SHARE THIS POST :

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest