reaking: Dhananjay Munde Resigns – Political Turmoil Unfolds

धनंजय मुंडे यांचा राजीनामा: राजकीय भूकंप की नैतिक जबाबदारी?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराडशी संबंधित आरोपांमुळे राज्य सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. अखेर काल रात्री झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. […]

Continue Reading

MahaKumbh 2025 : महाशिवरात्रीनिमित्त अंतिम शाही स्नानात भक्तांचा महासागर…

आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी, प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा अंतिम शाही स्नान सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. त्रिवेणी संगमावर लाखो भाविकांनी स्नान करून पुण्यसंचय केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक उर्जेने भरून गेला होता. महाकुंभमेळ्याचे महत्त्व आणि इतिहास महाकुंभमेळा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे, जो दर १२ वर्षांनी चार प्रमुख […]

Continue Reading
P. L. Deshpande Maharashtra Kala Academy

पु.ल.देशपांडे कला अकादमी पुन्हा कलावंतांच्या सेवेत दाखल होणार – २८ फेब्रुवारीला भव्य उद्घाटन!

मुंबईतील रंगभूमीचा एक अनमोल ठेवा – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता नूतनीकरणानंतर नव्या रूपात रंगकर्मी आणि कलाप्रेमींच्या सेवेत दाखल होत आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, या अत्याधुनिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, […]

Continue Reading
unique-environmental-campaign-in-bhokani-village

भोकणी गावाची ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ मोहीम: पर्यावरण रक्षणाची अनोखी शक्कल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने पर्यावरण रक्षणासाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ या उपक्रमाद्वारे गावकऱ्यांना प्लास्टिक कचरा जमा करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. या मोहिमेअंतर्गत, एक किलो प्लास्टिक कचरा आणणाऱ्याला अर्धा किलो साखर दिली जाते. या अभिनव उपक्रमामुळे गावातील प्लास्टिक प्रदूषण कमी होत आहे आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होत […]

Continue Reading

पिंगुळी लोककला महोत्सव २०२५: ठाकर समाजाच्या सांस्कृतिक वारशाची मेजवानी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावात प्रथमच ‘पिंगुळी लोककला महोत्सव २०२५’ रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा महोत्सव २२, २३ आणि २४ फेब्रुवारी या कालावधीत ठाकरवाडी म्युझियम, पिंगुळीच्या पटांगणावर संध्याकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळेत होणार आहे. उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती:या महोत्सवाचे उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी सकाळी […]

Continue Reading

मनू भास्कर आणि डी. गुकेश यांना ‘खेळ रत्न’ पुरस्कार – एक प्रेरणादायी प्रवास

भारतीय क्रीडाजगताला अभिमान वाटावा अशी एक मोठी कामगिरी नुकतीच घडली आहे. शूटिंगमध्ये चमक दाखवणारी मनू भास्कर आणि बुद्धिबळात भारताचं नाव जागतिक स्तरावर नेणारा डी. गुकेश यांना २०२५ चा ‘खेळ रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या चमकदार कामगिरीने संपूर्ण देश त्यांचा सन्मान करत आहे. चला, या दोन खेळाडूंच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. मनू भास्करचं नाव भारतीय […]

Continue Reading

तहव्वूर राणा कोण आणि त्याचं प्रत्यार्पण महत्वाचं का ?

२६/११ हल्ला म्हणजे भारतीयांसाठी एक अशी जखम जी कधीच भरून निघणार नाही. या ६० तासांपेक्षा जास्त चाललेल्या आतंकवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ निष्पाप जीव मारले गेले आणि या काळ्या दिवसाचा कर्ता करविता म्हणजे तहव्वूर राणा. तहव्वूर हुसैन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक आहे, ज्याच्यावर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागाचा आरोप आहे. राणा हा […]

Continue Reading

राज्य शासनातर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव , सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने सन 2022 या […]

Continue Reading

एक देश, एक निवडणूक

“एक देश, एक निवडणूक” ही संकल्पना भारतीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे आणि विकासकामांना गती देणे आहे. एक देश, एक निवडणूक हे धोरण जर राबवलं गेलं तर त्याचे काही […]

Continue Reading

पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

पाणी पिण्याच्या योग्य वेळेबाबत वेगवेगळी मतं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. काही लोक सांगतात की, जेवणाआधी पाणी प्यावं, तर काही सांगतात की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. काहीजण असंही सांगतात की, जेवणानंतर दोन तास पाणी टाळावं. दुसरीकडे, काहीजण म्हणतात की, तहान लागली तेव्हा पाणी पिणं उत्तम. या वेगवेगळ्या मतांमुळे अनेकांच्या मनात […]

Continue Reading