Entertainment

शब्दांमध्ये आहे विश्वाचे वैभव ! जागतिक काव्य दिन

“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…”

कविता केवळ शब्दांची रचना नव्हे, तर ती भावना गुंफणारी जादू आहे. ती जीवनाचा अर्थ उलगडते, संघर्षांना शब्द देते, आणि सौंदर्याला नव्या अर्थाने प्रकट करते. या अद्वितीय साहित्यसंपदेला असंख्य प्रतिभावंत कवींनी आपल्या लेखणीने समृद्ध केलं आहे. त्यांच्या या कविता प्रेम, बंडखोरी, समाजभान आणि अंतःकरणाला भिडणाऱ्या प्रेरणांनी भरलेल्या आहेत.

कुसुमाग्रज म्हणजे मराठी साहित्याचे तेजस्वी सूर्य. त्यांच्या कवितांमधून त्यांनी सत्य आणि मानवतावादाचा पाठ दिला. त्यांनी सामाजिक जाणिवा आणि तत्वज्ञानाला नव्या उंचीवर नेले. संघर्षाच्या क्षणी उभं राहण्यासाठी प्रेरित करणाऱ्या त्यांच्या कवितांमध्ये आजही असंख्य मराठी मनांना मार्गदर्शन करण्याची ताकद आहे. प्रेम आणि निसर्गाचा जादुई संगम म्हणजे मंगेश पाडगावकर यांची कविता. त्यांच्या रचना जीवनाचा गोडवा प्रकट करतात. त्यांचे शब्द म्हणजे जणू हृदयाला भिडणारे सूर, जे आजही प्रत्येक रसिकाच्या मनाचा ठेवा आहेत. इंदिरा संत यांनी आपल्या मुक्तछंद कवितांमधून मराठी साहित्यात नवी दृष्टी आणली. त्यांनी कवितांमधून नात्यांमधील गूढता, एकाकीपणाच्या छटा आणि आयुष्याच्या बारकाव्यांना साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांत गुंफले. शांता शेळके यांच्या कवितांमध्ये प्रेम, आठवणी आणि नॉस्टॅल्जियाचा अनोखा संगम दिसतो. त्यांच्या कवितांनी लेखणीतील जादू उलगडली. त्यांच्या शब्दांमध्ये लपलेली भावनेची जाणीव वाचकांच्या मनाला सतत मोहवते. विंदा करंदीकर यांनी आधुनिक मराठी कवितेच्या पायाभरणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या संग्रहांमधून त्यांनी अस्तित्वाच्या प्रश्नांवर विचारमंथन केलं. त्यांच्या कवितांमध्ये विचार आणि प्रयोगशीलतेचा अनोखा मिलाफ पाहायला मिळतो. मराठीत गझल रुजवणारे सुरेश भट हे नाव अजरामर आहे. गझलांमधून त्यांनी प्रेम, विरह आणि वेदनेला सुरेल स्वर दिले. त्यांच्या शब्दांनी मराठी गझलेला एक नवा आयाम दिला.

ग्रामीण जीवनाच्या निसर्गरम्य छटा बहिणाबाईंच्या कवितांमधून जिवंत होतात. त्यांच्या कवितांनी शेतकरी जीवनाच्या संघर्षांना आणि साधेपणाला शब्दरूप दिलं. त्यांची कविता म्हणजे निसर्गाशी आणि स्त्रीच्या मनाशी संवाद साधणारी जादू आहे. गदिमा, म्हणजे ग. दि. माडगुळकर. त्यांच्या गीतांनी मराठी अस्मितेला अभिमानाची ओळख दिली. त्यांच्या कवितांमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विलोभनीय चित्र उलगडलं आहे. पु. ल. देशपांडे यांच्या हास्यकवितांनी जीवनातील विसंगतींवर मार्मिक भाष्य करत रसिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं. त्यांच्या शैलीतला हजरजबाबीपणा आणि मार्मिकता प्रत्येक मराठी मनाला आनंद देऊन गेली आहे. अण्णाभाऊ साठे यांनी कवितांमधून कामगारांच्या संघर्षांना शब्द दिले. त्यांच्या कवितांमध्ये लोकजीवनाचा गोडवा आणि वेदना यांची अनोखी सांगड आहे. नामदेव ढसाळ यांच्या कवितांनी वंचित वर्गाचा आवाज बुलंद केला. त्यांच्या शब्दांनी अन्यायाला आव्हान दिलं आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणा दिली. त्यांच्या कवितांमधून जळजळीत सत्याचा आवाज ऐकू येतो.

बा. सी. मर्ढेकर यांनी मराठी कवितेत आधुनिकतेचे नवीन वळण आणले. त्यांनी काळाच्या परिवर्तनाला कवितेतून व्यक्त केलं. त्यांच्या लेखणीतून जगण्याचा नवा अर्थ उलगडला, ज्याने मराठी कवितेला गहिरा विचारांचा साज दिला. त्यांच्या कवितेंची प्रेरणा घेऊन कवी ग्रेस यांच्या कवितांनी भावनांच्या खोल अनुभवांना शब्द दिले. त्यांच्या कवितांमध्ये व्यक्त होणारी आर्तता आणि नॉस्टॅल्जिया प्रत्येक वाचकाच्या मनाला आजही भिडतो.

परंपरेच्या कोंदणातून बाहेर पडत, मराठी कवितेने काळानुरूप नवे आयाम जोपासले. कधी ती प्रेमळ भावनेची साक्षीदार झाली, तर कधी बंडखोरीचा आवाज. प्रत्येक कवीने आपली स्वतःची शैली, आपले स्वतःचे शब्द या प्रवासात मिसळत मराठी साहित्याला नव्या उंचीवर नेलं.याच कवितांमधून आपल्याला आयुष्याच्या ईश्वरीय अनुभवांचा साक्षात्कार होत राहो जसा तो वसंत बापटांच्या प्रार्थनेत होतो जेंव्हा ते म्हणतात…

“सकलशरण मनमोहन, सृजन तूच, तूच विलय… गगन सदन तेजोमय”

Admin

Recent Posts

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…

42 minutes ago

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

4 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

5 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

23 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

24 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago