Random News

आधी नवरा, मग सासरा, वाचा क्राइम पेट्रोलला ही लाजवेल बबलीची करामत!

सदर घटना आग्रा येथील बमरौली कटारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली आहे. बुधवारी रात्री एका महिलेने प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेल्या सासऱ्याची प्रियकरासोबत मिळून हत्या केली. त्यानंतर सासऱ्याचा मृतदेह शेतात फेकून दिला. घटनेनंतर प्रियकरासोबत ती फरार झाली आहे. या प्रकरणामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस या दोन्ही फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 

या महिलेचे नाव बबली असे असून, मयत राजवीर यांच्या पत्नी मुन्नी देवी यांनी आपल्या सुनेविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, बबलीवर सासऱ्यांच्या खुनाचा आरोप आहे. राजवीर हे आपल्या सुनेला तिच्या परपुरुषासोबत नातेसंबंधाला विरोध करत होते. या रागातूनच तिने पतीची हत्या केली असल्याचा आरोप बबलीच्या सासुबाई मुन्नी देवी यांनी केला आहे. 

मुन्नी देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बबली हिने तिचा पती हरिओमची देखील हत्या केली होती. याप्रकरणी तब्बल साडेपाच वर्षे ती तुरूंगात होती. तुरूंगातच तिची ओळख प्रेमसिंहसोबत झाली. तिथेच बबली आणि प्रेमसिंह यांच्यामध्ये जवळीक झाली.  प्रेमसिंहनेच बबलीची जामिनावर सुटका केली. सुटकेनंतर बबली आणि प्रियकर महल बादशाही परिसरात एकत्र राहत होते.  हे राजवीर यांना समजताच त्यांनी सुनेला विरोध केला व प्रेमसिंहसोबतचे संबंध संपविण्यास सांगितले. 

सासऱ्यांच्या विरोधाला कंटाळून बबली आणि प्रेमसिंहने त्यांना संपवण्याचा कट रचला. बबलीने राजवीर यांना आपल्यासोबत महल बादशाही येथे घेऊन गेली होती. रात्री बबली आणि प्रेमसिंहने राजवीर यांना शेतात नेऊन त्यांची गळा दाबून हत्या केली. सासरे गेल्याची खात्री केल्यानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. आता पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

22 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

22 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago