एक वधू दोन वर! महिलेने केले द्रौपदी प्रथेनुसार दोन भावांशी लग्न

आजच्या स्वार्थी जगात कुणी साधं चॉकलेट सुद्धा शेअर करत नाहीत, मग आपला जीवनसाथी शेअर करणं तर लांबचं राहिलं. आताचं उदाहरण द्यायचं झाल्यास “कोल्ड प्ले” कॉन्सर्टमध्ये एका जोडप्याचं भाडं उघडं पडलं. त्यानंतर त्या जोडप्याची झालेली पळापळ अगदी जगभर प्रसिद्ध झाली.

भारत याबाबतीत थोडा वेगळा आहे. भारताला विविध परंपरा, रूढी, प्रथांचा इतिहास आहे. प्रत्येक भागात वेगवेगळ्या परंपरा, सवयी, आणि जीवनशैली आढळून येतात. काही परंपरा काळाच्या पडद्या आड झाल्या असल्या तरी काही परंपरा अजूनही जिवंत आहेत. अशीच एक अनोखी प्रथा हिमाचल प्रदेशात आजही जिवंत आहे. या प्रथेचे नाव “द्रौपदी प्रथा” असे आहे.

नुकतेच हिमाचल प्रदेशातील “हट्टी” समाजातील एका महिलेने द्रौपदी प्रथेनुसार दोन भावांशी लग्न केले. या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात हे लग्न पार पडले. जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. शिलाई गावातील प्रदिप नेगी आणि कपिल नेगी या दोन बंधूंचा कुन्हट गावातील सुनीता हिच्याशी विवाह संपन्न झाला. तिथल्या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही त्यांची पुर्वापार चालत आलेली प्रथा आहे. त्यामुळे असा विवाह त्यांच्यासाठी नवलाची गोष्ट नाही. काही वेळा एका घरात तीन किंवा चार भाऊ असतील तर तिथे देखील कुटुंबीय आणि वधू वरांच्या संमत्तीने असे विवाह लावले जातात.

काय आहे ही द्रौपदी प्रथा?
महाभारतातील द्रौपदी विवाह कथेशी याचा संबंध आहे. द्रौपदी प्रथेला बहुपती प्रथा असेही म्हणतात. या प्रथेनुसार एक महिला एकाच कुटुंबातील भावांशी लग्न करते. ही प्रथा मुख्यत: हिमाचल प्रदेशातील सिरमौर, किन्नौर भागांमध्ये आढळते.

या प्रथेमागे काही सामाजिक आणि आर्थिक कारण असल्याचे सांगितले जाते. डोंगराळ भागातील लोकसंख्या कमी असल्याने, शेतीची जागा कमी असते. अशात जर सगळ्या भावंडांनी वेगवेगळे कुटुंब प्रस्थापित केल्यास मालमत्ता वाटणीचा प्रश्न उद्भवू शकतो. यामुळे एकाच महिलेशी विवाह करून कुटुंब एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

भारतीय कायद्यानुसार, बहुपती करणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अशा विवाहांचा सरकारी किंवा कायदेशीर नोंदवहित समावेश केला जात नाही. तरीही काही भागांत ही प्रथा अजूनही सांस्कृतिक व पारंपारिक स्वरूपात अस्तित्वात आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

18 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

18 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago