Random News

‘व्वा काय प्लॅन’ – विनोदाच्या गाभ्यातून गंभीरतेचा स्पर्श करणारे संजय खापरे यांचे नवे नाटक!

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी रंगभूमीवर विविध विषयांची नाटके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्या मालिकेत आता आणखी एक नाव जोडले गेले आहे – ‘व्वा काय प्लॅन’! अभिनेता-दिग्दर्शक संजय खापरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेले हे नवे नाटक २४ एप्रिल रोजी दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रथमच सादर झाले आणि त्याला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. त्यानंतर नाट्यरसिकांच्या टाळ्यांच्या गजरात विविध ठिकाणच्या नाट्यगृहांमध्ये या नाटकाच्या यशस्वी प्रयोगाची मालिका सुरु झाली आहे.

नाटकाची संकल्पना : हास्यातून मांडलेला वास्तवदर्शी विषय
‘व्वा काय प्लॅन’ हे नाटक मुंबईतील चाळ संस्कृतीवर आधारित असून, चाळीत राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांमधील दैनंदिन समस्यांवर हे नाटक प्रकाश टाकते. जागेचा अपुरा वापर, वाढती जबाबदारी, पिढ्यानपिढ्यांचा तणाव यांचा विनोदी पद्धतीने घेतलेला वेध या नाटकातून आकर्षकरित्या मांडण्यात आला आहे.
संजय खापरे यांनी या नाटकात ‘विक्रम सगळे’ या प्रमुख भूमिकेची जबाबदारी पार पाडली आहे. विषय गंभीर असला तरी तो हसत-हसवत मांडण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर नकळत विचारांचे बीज पेरले जाते.

कलाकारांचा भन्नाट संच
या नाटकात अनुभवी आणि नवोदित कलाकारांचा सुंदर मेळ पाहायला मिळतो. संजय खापरे यांच्यासोबत सचिन देशपांडे, दीपाली चौगुले, श्रद्धा मांगले, केदार शिर्सेकर, आसावरी ऐवळे, किरण शिंदे, रुतिका चाळके, सचिन पाटील हे कलाकार आपली वेगवेगळी पात्रं जिवंत करत नाटकात रंग भरतात.

लेखन व सादरीकरण
नाटकाची कथा गौरव बहुतुले आणि कोमल वंजारे यांनी लिहिली असून, संजय खापरे यांच्या सशक्त दिग्दर्शनामुळे कथेला गती आणि ताकद मिळते.
• नेपथ्य : महेश घालवलकर
• वेशभूषा : दीपाली चौगुले
• रंगभूषा : अभय मोहिते
• संगीत : कृष्णा-देवा
या तंत्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे रंगमंचावर एक रंगीत आणि वास्तवदर्शी चाळीचे चित्र उभे राहते.

दिग्दर्शक ते कलाकार – संजय खापरे यांचा प्रवास
चित्रपटसृष्टीत ‘दे धक्का’, ‘काकस्पर्श’, ‘गाढवाचं लग्न’, ‘लय भारी’, ‘दगडी चाळ’ यांसारख्या चित्रपटांतून आपल्या दर्जेदार अभिनयाची छाप सोडणारे संजय खापरे हे रंगभूमीवरही तितकेच प्रभावी ठरले आहेत. याआधी ‘गलतीसे मिस्टेक’ आणि ‘डोन्ट वरी, हो जाएगा’ या नाटकांच्या दिग्दर्शनातून त्यांनी रंगभूमीवर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘व्वा काय प्लॅन’ हे त्यांच्या दिग्दर्शनातील तिसरे नाटक असून, लवकरच ते चित्रपट दिग्दर्शनात देखील पदार्पण करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

नाट्यप्रेमींनो, ‘व्वा काय प्लॅन‘ नक्की बघा!
एक हलकाफुलका सस्पेन्स, हसत हसत मांडलेला गंभीर विषय आणि नाट्यगृहात रंगणारा वास्तविक आयुष्याचा आरसा – ‘व्वा काय प्लॅन’ हे नाटक नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करून जाईल. सत हसत अंतर्मनाला भिडणारे, चाळसंस्कृतीचे वास्तव उलगडणारे आणि घराघरातलं चित्र रंगमंचावर खुलवणारे असे हे नाटक प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच भिडणार आहे.

संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून अनुभव घ्यावा असा हा नाट्यप्रवास आहे – विनोद, भावना आणि विचार यांचा उत्तम मिलाफ असलेलं ‘व्वा काय प्लॅन’ हे नाटक एक वेगळी रंगभूमी अनुभव देणारं ठरत आहे. हे नाटक नाट्यगृहांमध्ये येऊन 5 दिवस झाले आणि अजूनही जर तुम्ही हे नाटक पाहिले नसेल, तर आपल्या कुटुंबासह किंवा मित्रांसोबत एक आनंददायक अनुभव घेण्यासाठी जवळच्या नाट्यगृहात जाऊन हा अनुभव घ्यायचा प्लॅन जरुर करा.

 

Team Jabari Khabari

Recent Posts

लग्न नको म्हणून रचला सिने स्टाईल प्लॅन; सापाची कात ठेवून प्रियकरासोबत काढला पळ

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकाच फिल्मी प्रकार समोर आला आहे. लग्नापासून सुटका…

3 hours ago

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

1 day ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

1 day ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago