Random News

Virushka News : विराट-अनुष्काचा साधेपणातील राजेशाही थाट!

आज सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा लंडनमधील एक छोटासा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये दोघेही शांतपणे रस्त्याने चालत आहेत, कुठेही मोठा सिक्युरिटी ताफा नाही, तामझाम नाही; फक्त साधेपणाने हातात छत्री आणि पाण्याची बाटली घेतलेला विराट आणि त्याच्या बाजूला हसत-गप्पा मारत चालणारी अनुष्का!

या व्हिडिओने अनेकांची मनं जिंकली, कारण त्यात “स्टार कपल” दिसत नाही, तर असं जोडपं दिसतं जे सामान्य माणसासारख्या साध्या जीवनात आनंद मानतं. सहज रस्त्यावरून जात असताना, अनोळखी लोकांशी प्रेमाने गप्पा मारतात; कुणी हाक मारली तर थांबून आपुलकीने विचारपूस करतात.

आजच्या धावपळीत आणि प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही इतका साधेपणा आणि आपुलकी दाखवणं हेच त्यांचं सर्वात मोठं आकर्षण आहे. लोकांनी या व्हिडिओवर “Simple yet Royal”, “Real Power is Kindness” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि त्या अगदी योग्य आहेत.

आपण सगळे त्यांच्याकडून एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट शिकू शकतो, प्रसिद्धी असो वा साधं आयुष्य, चांगलं वागणं, प्रेमाने बोलणं आणि लोकांचा सन्मान करणं हेच खरे संस्कार असतात. शेवटी एवढंच सांगावसं वाटतं की, प्रेम आणि नम्रता नेहमीच लोकांच्या मनात जागा मिळवतात, आणि ज्या जोडीला हे जमतं, तेच खरं “स्टार कपल”!

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

22 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

22 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago