News

“चार फुल आणि एक ज्ञानपीठ: विनोद कुमार शुक्ल”

“हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था।
हताशा को जानता था, इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया।
मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ।
मुझे वह नहीं जानता था मेरे हाथ बढ़ाने को जानता था।
हम दोनों साथ चले… दोनो एक दूसरे को नहीं जानते थे,
साथ चलने को जानते थे।”

  • विनोद कुमार शुक्ल

हिंदी साहित्यातील प्रख्यात कवी आणि लेखक… यांना २०२४ सालासाठीचा ५९वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा सन्मान त्यांच्या सृजनशीलतेची आणि साहित्यिक योगदानाची पावती आहे.

साहित्यिक प्रवास
शुक्ल यांची साहित्यिक कारकीर्द त्यांच्या पहिल्या कविता संग्रह ‘लगभग जय हिंद’ (1971) पासून सुरू झाली. त्यानंतर ‘वह आदमी चला गया नया गरम कोट पहिनकर विचार की तरह’ (1981), ‘सब कुछ होना बचा रहेगा’ (1992) आणि ‘अतिरिक्त नहीं’ (2000) असे अनेक कविता संग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या ‘नौकर की कमीज’ (1979) या कादंबरीवर मणि कौल यांनी चित्रपट बनवला, ज्याने त्यांच्या लेखनाला व्यापक प्रसिद्धी मिळवून दिली.

काव्यशैली आणि रचना
शुक्ल यांच्या कवितांमध्ये प्रेम, प्रकृती आणि सामान्य माणसाच्या जीवनातील सूक्ष्म पैलूंचे सुंदर वर्णन आढळते. त्यांच्या रचनांमध्ये जादुई वास्तववादाची झलक दिसते, जी त्यांच्या साहित्याला वेगळेपण देते. उदाहरणार्थ, त्यांच्या ‘सबसे गरीब आदमी की’ या कवितेत ते लिहितात:
“सबसे गरीब आदमी की
सबसे कठिन बीमारी के लिए
सबसे बड़ा विशेषज्ञ डॉक्टर आए
जिसकी सबसे ज्यादा फीस हो”
या ओळींमध्ये ते समाजातील विषमता आणि गरिबांच्या समस्यांवर प्रकाश टाकतात.

‘चार फूल हैं और दुनिया है’ – शुक्ल यांच्या प्रवासाची झलक
अभिनेता आणि लेखक मानव कौल यांनी दिग्दर्शक अचल मिश्रा यांच्यासह ‘चार फूल हैं और दुनिया है’ या डॉक्युमेंटरीत शुक्ल यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. ही डॉक्युमेंटरी मणि कौल आणि शुक्ल यांच्यातील संवादांवर आधारित आहे आणि त्यांचे साहित्यिक दृष्टिकोण उलगडते. ही फिल्म MUBI या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

साहित्यिक योगदान आणि पुरस्कार
शुक्ल यांच्या ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबरीसाठी त्यांना 1999 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘आदमी की औरत’ या कथेनुसार बनलेल्या चित्रपटाला 66व्या वेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये विशेष सन्मान मिळाला होता.
ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांचा सन्मान होणे, हे हिंदी साहित्याच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे. त्यांच्या साहित्यिक प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांच्या रचनांनी वाचकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
जाता जाता एवढंच म्हणू…

जाते-जाते कुछ भी नहीं बचेगा जब
तब सब कुछ पीछे बचा रहेगा

और कुछ भी नहीं में
सब कुछ होना बचा रहेगा।

Team Jabari Khabari

Recent Posts

“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…

3 days ago

Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…

4 days ago

ट्रम्प यांनी भारतावर लादले कठोर टॅरिफ! रशियासोबत व्यवहाराचा फटका?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…

4 days ago

Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…

5 days ago

जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…

6 days ago

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…

6 days ago