आज भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे! अंतराळातून भारताचा सुपुत्र, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, पृथ्वीवर परत येत आहेत. त्यांच्या १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासाने प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. शुक्ला यांनी ॲक्सिओम-४ (Ax-4) या खासगी अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले. ते आयएसएसला भेट देणारे पहिले भारतीय ठरले आहेत आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत. ही केवळ एक यशस्वी मोहीम नसून भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी (गगनयान) एक महत्त्वाचा टप्पा आहे.
१८ दिवसांच्या वास्तव्यात, शुक्ला आणि त्यांच्या चमूने ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले. यामध्ये सूक्ष्मगुरुत्वाकर्षणात रक्तातील ग्लुकोज तपासणे (मधुमेही व्यक्तींना भविष्यात अंतराळात जाण्यासाठी) आणि अंतराळातील शेतीचे प्रयोग (उदा. मूग आणि मेथीच्या बियांची उगवण, सूक्ष्मशेवाळाचे संशोधन) यांचा समावेश आहे. याशिवाय ISRO साठी देखील ७ वेगवेगळे प्रयोग करून पाहिले, जे भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी उपयोगी ठरणार आहेत. अंतराळातून शुक्ला यांनी राकेश शर्मा यांच्या “सारे जहाँ से अच्छा” या शब्दांची आठवण करून दिली आणि “आजचा भारत महत्त्वाकांक्षी, निडर, आत्मविश्वासपूर्ण आणि गर्वाने भरलेला दिसतो” असे सांगितले.
१४ जुलै रोजी आयएसएसमधून त्यांचे यान वेगळे झाले आणि १५ जुलै रोजी म्हणजे आज त्यांचे यान पॅसिफिक महासागरात सुरक्षितपणे उतरणार आहे. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी एक आठवड्याचा पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण करावा लागेल.
शुभांशू शुक्लांची मोहीम भारताच्या अंतराळ इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. या मोहिमेने केवळ मानवी अंतराळ संशोधनात भारताची उपस्थिती पुन्हा प्रस्थापित केली नाही, तर गगनयानसारख्या भविष्यातील मोहिमांसाठी मजबूत पाया रचला आहे.
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…
दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…
वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…