शुभांशू शुक्ला – भारताचा सुपुत्र अंतराळातून सुखरूप पृथ्वीवर

आज भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे! अंतराळातून भारताचा सुपुत्र, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, पृथ्वीवर परत येत आहेत. त्यांच्या १८ दिवसांच्या अंतराळ प्रवासाने प्रत्येक भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. शुक्ला यांनी ॲक्सिओम-४ (Ax-4) या खासगी अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) गाठले. ते आयएसएसला भेट देणारे पहिले भारतीय ठरले आहेत आणि राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात प्रवास करणारे दुसरे भारतीय अंतराळवीर आहेत. ही केवळ एक यशस्वी मोहीम नसून भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमासाठी (गगनयान) एक महत्त्वाचा टप्पा आहे.

१८ दिवसांच्या वास्तव्यात, शुक्ला आणि त्यांच्या चमूने ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले. यामध्ये सूक्ष्मगुरुत्वाकर्षणात रक्तातील ग्लुकोज तपासणे (मधुमेही व्यक्तींना भविष्यात अंतराळात जाण्यासाठी) आणि अंतराळातील शेतीचे प्रयोग (उदा. मूग आणि मेथीच्या बियांची उगवण, सूक्ष्मशेवाळाचे संशोधन) यांचा समावेश आहे. याशिवाय ISRO साठी देखील ७ वेगवेगळे प्रयोग करून पाहिले, जे भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी उपयोगी ठरणार आहेत. अंतराळातून शुक्ला यांनी राकेश शर्मा यांच्या “सारे जहाँ से अच्छा” या शब्दांची आठवण करून दिली आणि “आजचा भारत महत्त्वाकांक्षी, निडर, आत्मविश्वासपूर्ण आणि गर्वाने भरलेला दिसतो” असे सांगितले.

१४ जुलै रोजी आयएसएसमधून त्यांचे यान वेगळे झाले आणि १५ जुलै रोजी म्हणजे आज त्यांचे यान पॅसिफिक महासागरात सुरक्षितपणे उतरणार आहे. पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांना गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी एक आठवड्याचा पुनर्वसन कार्यक्रम पूर्ण करावा लागेल.

शुभांशू शुक्लांची मोहीम भारताच्या अंतराळ इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. या मोहिमेने केवळ मानवी अंतराळ संशोधनात भारताची उपस्थिती पुन्हा प्रस्थापित केली नाही, तर गगनयानसारख्या भविष्यातील मोहिमांसाठी मजबूत पाया रचला आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

16 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

17 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago