Random News

दगडाला रूप देणारे शिल्पमहर्षी राम सुतार !

एका सामान्य घरात जन्मलेल्या मुलाने स्वप्न पाहिलं इतिहासाला शिल्पात बंदिस्त करण्याचं!
हातात हातोडा आणि छिन्नी घेतली… आणि पाहता पाहता त्याने दगडांना रूप दिलं, इतिहासाला चेहरा दिला, आणि संस्कृतीला नव्या उंचीवर नेलं. ही गोष्ट दुसरी कोणाची नसून गेली १०० वर्ष आपली शिल्पकलेची साधना अखंडपणे सुरू ठेवत, नव्या कल्पनांना मूर्तरूप देणारे ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार.

१९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळ्याच्या गोंडूर गावात एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या राम सुतार यांनी आपल्या मेहनतीने जगभर लौकिक मिळवला. मुंबईतील ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ येथे त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण घेतले. त्यांच्या सरकारी सेवेत अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीसह पंचवार्षिक योजनांची लघुशिल्पे घडवण्याची जबाबदारी होती. मात्र, १९६० पासून स्वतंत्रपणे कार्य करण्याचा निर्णय घेत त्यांनी स्वतःचा स्टुडिओ स्थापन केलं.

त्यांच्या कुशल हातांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शिल्पकृतींनी भारतीय जनमानसाला प्रेरित केले. त्याचबरोबर मौलाना आझाद (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) या महान नेत्यांचे भव्य शिल्प संसद भवनाच्या आवारात उभे केले. फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड या देशांमध्येही त्यांची शिल्पकला आदराने उभी आहे.

गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ स्मारक असो वा मुंबईतील इंदू मिलमध्ये उभारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील भव्य मूर्तीचे शिल्प असो, राम सुतार आजही १०० व्या वर्षातही अविरत कार्यरत आहेत. त्यांचे अद्वितीय योगदान पाहता शिल्पकलेच्या युगपुरुषाला महाराष्ट्र सरकारने २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्यातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कलेला दिलेली सन्मानाची शिल्पमुद्रा !

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून २०१६ चा ‘टागोर पुरस्कार’ जाहीर झाला होता आणि आता ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या कार्याचा आणखी गौरव झाला आहे.

राम सुतार हे केवळ शिल्पकार नाहीत, तर भारतीय संस्कृतीचे मूर्त स्वरूप घडवणारे युगपुरुष आहेत. त्यांच्या कुशलतेने घडलेली शिल्पे युगानुयुगे इतिहासाचे साक्षीदार राहतील. त्यांच्या कार्याला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने नवे सोनेरी पान मिळाले असून, भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात त्यांचे योगदान अजरामर राहील.

Admin

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

16 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

17 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago