News

Rahul Gandhi PC: VoteChoriचा पुन्हा तगादा! राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Rahul Gandhi Press Conference on ECI: केंद्रीय निवडणूक आयोग व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असून त्यासंदर्भातले काही पुरावेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. मतदार यादीतून काही व्यक्तींची नावं वगळण्यासाठी त्यांच्या ओळखीचा वापर भलत्याच व्यक्तींनी केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, यासाठी राज्याबाहेरचे मोबाईल क्रमांक ओटीपीसाठी वापरले गेल्याचंही ते म्हणाले. जवळपास पाऊण तास चाललेल्या सादरीकरणानंतर राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली.

नक्की वाचा

Causes of Cancer : कॅन्सर नेमका कशामुळे होतो ? ‘या’ गोष्टी आहेत महत्त्वाच्या ! जाणून घ्या

Navaratri 2025 : फॅशन की अध्यात्म? नवरात्रीच्या नऊ रंगाची  स्टोरी… 

‘एक Xerox दे ना’ म्हणणाऱ्यांनो झेरॉक्स म्हणजे काय माहीत आहे का? उत्तर ऐकून पुन्हा नाही मागणार झेरॉक्स

राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

यावेळी पुरावे सादर करताना राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली. “देशात चालू असलेली मतचोरी कोण करतंय हे निवडणूक आयुक्तांना माहिती आहे. पण ते या सगळ्या घोटाळेबाजांना पाठिशी घालत आहेत, त्यांचा बचाव करत आहेत”, असा आरोप राहुल गांधींनी केला.

“कर्नाटकमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला. राज्य सीआयडीनं निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातली माहिती मार्च २०२३ मध्ये मागितली. ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगानं उत्तर दिलं, पण त्यात माहिती दिलेली नव्हती. जानेवारी २०२४ मध्ये सीआयडीनं पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहून पूर्ण माहितीची मागणी केली. पण त्यावर उत्तर आलं नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये सीआयडीनं निवडणूक आयोगाला शेवटचं पत्र लिहिलं. हे सगळं होत असताना कर्नाटक निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि या माहितीची मागणी केली. अनेकदा ही मागणी केली गेली. पण त्यावर काहीही उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे हा स्पष्ट पुरावा आहे की जे लोक हे करत आहेत, त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वाचवत आहेत”, असा थेट आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे मागितली तीन प्रकारची माहिती

पत्रकार परिषदेत वोट चोरीचा आरोप करताना राहुल गांधींनी निवडणूक आयोगाकडे तीन प्रकारच्या माहितीची मागणी केली आहे.

१. मतदारांची नावं वगळण्यासाठीचे अर्ज केले त्या उपकरणांचा आयपी

२. नावं वगळण्यासाठीचे अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांचे पत्ते

३. अर्ज केल्यानंतर आलेले ओटीपी नेमके कुणाकडे गेले याची माहीती

ही सर्व माहिती निवडणूक आयोगाने न दिल्यास ते घोटाळेबाजांना वाचवत असल्याचं सिद्ध होईल, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला ७ दिवसांचा अल्टिमेटम!

“आता प्रश्न आहे की हे सगळं कोण करतंय? याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे आहे. हे जे कुणी करत आहेत, ते थेट भारताच्या राज्यघटनेवर हल्ला करत आहेत. आणि अशा लोकांना मुख्य निवडणूक आयुक्त वाचवत आहेत. ते कर्नाटकच्या सीआयडीलाही माहिती देत नाहीयेत”, असं राहुल गांधी म्हणाले.

“ज्ञानेश कुमार यांनी देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना वाचवणं बंद केलं पाहिजे. आम्ही १०० टक्के पुरावे सादर केले आहेत. हे पुरावे कुणीही नाकारू शकत नाही. निवडणूक आयोगाने आठवड्याभरात सगळी माहिती जाहीर करावी. नाहीतर ज्ञानेश कुमार घोटाळे करणाऱ्यांना वाचवत असल्यावर शिक्कामोर्तब होईल”, अशी मागणी यावेळी राहुल गांधींनी केली.

Team Jabari Khabari

Recent Posts

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…

1 hour ago

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

5 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

6 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

24 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

1 day ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago