अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस तणावपूर्ण होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतावर टीकेचा सूर लावत नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या विधानामुळे केवळ राजकीय पातळीवरच नव्हे तर सामाजिक स्तरावरही चर्चेला तोंड फुटलं आहे.
काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने भारतावर २५% टॅरिफचे संकट लावले. त्यानंतर रशियाकडून कच्चं तेल आयात करतो म्हणून भारतावर अजून २५% टक्क्यांचे टॅरिफ लादले गेले. या निर्णयामुळे भारतीय नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असतानाच, पीटर नवारो भारतावर सातत्याने टीका करत आहेत. नुकतेच फॉक्स न्यूज चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत भारतातील विशिष्ट समाजावर गंभीर विधान केले आहे.
मुलाखतीमध्ये नवारो यांनी भारतातील काही निवडक श्रीमंत व्यावसायिकांचाच आर्थिक फायदा करून दिला जात असल्याच्या आरोपासह भारत म्हणजे रशियासाठी फक्त धुणीघर असल्याचं म्हटलं आहे. सामान्य भारतीयांचं नुकसान करून काही मोजक्या ब्राम्हण व श्रीमंत व्यावसायिकांचे खिसे भरले जात आहेत, असा घणाघात त्यांनी केला. नवारो पुढे म्हणाले की, भारताने रशियाकडून कच्चं तेल घेतल्यामुळे तेथील पैशातून रशिया युक्रेनविरोधी युद्धासाठी शस्त्रास्त्रांची खरेदी करत आहे. याचा थेट परिणाम युक्रेनच्या नागरिकांच्या जीवाशी होत आहे.
याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही भाष्य केले. “मोदी हे महान नेते आहेत. मात्र, जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा भारक रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत इतकी जवळीक का साधत आहेत, हे कळत नाही,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनमध्ये SCO परिषदेसाठी उपस्थित होते. या दौऱ्यात मोदी यांनी पुतिन यांच्यासमवेत गळाभेट घेतली आणि शी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. हे फोटो मोदींनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नवारोंची टीका अधिक चर्चेत आली.
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…