Random News

पाकिस्तानचा धक्कादायक खुलासा: तीन दशकांपासून दहशतवादाला पाठिंबा दिल्याची संरक्षण मंत्र्यांची कबुली

पाकिस्तानने दहशतवाद पसरवण्याची कबुली दिली
ब्रिटनच्या स्काय न्यूज वाहिनीवरील यल्दा हकीम यांच्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं की, “आम्ही जवळपास 30 वर्षांपासून अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी हे ‘गंदे काम’ करत आहोत.” या वाक्याचा अर्थ असा की, पाकिस्तानने शीतयुद्ध काळात आणि त्यानंतर 9/11 च्या घटनेनंतर अमेरिकेच्या धोरणांतर्गत अनेकदा दहशतवादी गटांना हातभार लावला.

पाकिस्तानच्या कबुलीचा अर्थ काय?
या कबुलीचा थेट अर्थ असा होतो की, दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान अग्रस्थानी राहिलाय. भारताने आणि अन्य अनेक देशांनी यापूर्वीही संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर याच बाबीवर पाकिस्तानविरोधात ठाम भूमिका घेतली होती. आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वतःच ही गोष्ट कबूल केल्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणला जाऊ शकतो.

लष्कर-ए-तोयबा बद्दलही दिली प्रतिक्रिया
ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या मुलाखतीत लष्कर-ए-तोयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत सांगितलं की, “लष्करचा पाकिस्तानशी पूर्वी संबंध होता, परंतु आता ही संघटना संपलेली आहे.” त्यांनी हेही म्हटलं की, “लष्करचा काही काळ पाकिस्तानशी संबंध होता याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना थेट मदत करत होतो.”

‘ऑल आउट वॉर’ चा उल्लेख
भारतासोबत ‘ऑल आउट वॉर’ची शक्यता दर्शवणारे ख्वाजा आसिफ यांनी यावेळी थोडं मवाळ भाषेत बोलताना, पाकिस्तानचा आताचा हेतू शांतीचा असल्याचे संकेत दिले. पण त्यांच्या वक्तव्यातील विसंगती आणि स्वीकृती यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा मुद्दा निर्माण केला आहे. भारताने अनेक वेळा पाकिस्तानवर दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचे आरोप केले होते. आता या आरोपांना थेट पाकिस्तानकडूनच दुजोरा मिळाल्याने, पाकिस्तानची जागतिक प्रतिमा आणखी डागाळली आहे.

हे वक्तव्य केवळ एका देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम करत नाही, तर दहशतवादाविरोधातील जागतिक लढ्याच्या पार्श्वभूमीवरही गंभीर ठरणार आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

लग्न नको म्हणून रचला सिने स्टाईल प्लॅन; सापाची कात ठेवून प्रियकरासोबत काढला पळ

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकाच फिल्मी प्रकार समोर आला आहे. लग्नापासून सुटका…

3 hours ago

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

1 day ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

1 day ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago