News

पाकिस्तानचा धक्कादायक खुलासा: तीन दशकांपासून दहशतवादाला पाठिंबा दिल्याची संरक्षण मंत्र्यांची कबुली

पाकिस्तानने दहशतवाद पसरवण्याची कबुली दिली
ब्रिटनच्या स्काय न्यूज वाहिनीवरील यल्दा हकीम यांच्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं की, “आम्ही जवळपास 30 वर्षांपासून अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी हे ‘गंदे काम’ करत आहोत.” या वाक्याचा अर्थ असा की, पाकिस्तानने शीतयुद्ध काळात आणि त्यानंतर 9/11 च्या घटनेनंतर अमेरिकेच्या धोरणांतर्गत अनेकदा दहशतवादी गटांना हातभार लावला.

पाकिस्तानच्या कबुलीचा अर्थ काय?
या कबुलीचा थेट अर्थ असा होतो की, दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान अग्रस्थानी राहिलाय. भारताने आणि अन्य अनेक देशांनी यापूर्वीही संयुक्त राष्ट्रांमध्ये आणि विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर याच बाबीवर पाकिस्तानविरोधात ठाम भूमिका घेतली होती. आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वतःच ही गोष्ट कबूल केल्यामुळे त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव आणला जाऊ शकतो.

लष्कर-ए-तोयबा बद्दलही दिली प्रतिक्रिया
ख्वाजा आसिफ यांनी त्यांच्या मुलाखतीत लष्कर-ए-तोयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत सांगितलं की, “लष्करचा पाकिस्तानशी पूर्वी संबंध होता, परंतु आता ही संघटना संपलेली आहे.” त्यांनी हेही म्हटलं की, “लष्करचा काही काळ पाकिस्तानशी संबंध होता याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांना थेट मदत करत होतो.”

‘ऑल आउट वॉर’ चा उल्लेख
भारतासोबत ‘ऑल आउट वॉर’ची शक्यता दर्शवणारे ख्वाजा आसिफ यांनी यावेळी थोडं मवाळ भाषेत बोलताना, पाकिस्तानचा आताचा हेतू शांतीचा असल्याचे संकेत दिले. पण त्यांच्या वक्तव्यातील विसंगती आणि स्वीकृती यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाकडून प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

ख्वाजा आसिफ यांच्या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मोठा मुद्दा निर्माण केला आहे. भारताने अनेक वेळा पाकिस्तानवर दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचे आरोप केले होते. आता या आरोपांना थेट पाकिस्तानकडूनच दुजोरा मिळाल्याने, पाकिस्तानची जागतिक प्रतिमा आणखी डागाळली आहे.

हे वक्तव्य केवळ एका देशाच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम करत नाही, तर दहशतवादाविरोधातील जागतिक लढ्याच्या पार्श्वभूमीवरही गंभीर ठरणार आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…

1 day ago

Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…

2 days ago

ट्रम्प यांनी भारतावर लादले कठोर टॅरिफ! रशियासोबत व्यवहाराचा फटका?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…

2 days ago

Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…

3 days ago

जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…

4 days ago

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…

4 days ago