Categories: Random News

ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह कोण आहेत?

पहलगाम हल्ल्याचा सूड – ऑपरेशन सिंदूरची कारवाई
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली. भारताने याचा प्रतिशोध घेण्यासाठी ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ ही विशेष मोहीम राबवली.
या ऑपरेशनअंतर्गत भारतीय लष्कराने आणि वायूदलाने एकत्र येत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये घुसखोरी करून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्यांत जवळपास ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे.

कोण आहेत कर्नल सोफिया कुरेशी?
कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्करातील एक तेजस्वी आणि कणखर अधिकारी आहेत. त्या भारतीय सैन्यात ‘लेफ्टनंट कर्नल’ म्हणून कार्यरत आहेत. २०१६ मध्ये पुण्यात पार पडलेल्या ‘एक्सरसाइज फोर्स 18’ या बहुराष्ट्रीय सैन्य सरावात त्यांनी १८ देशांच्या उपस्थितीत भारतीय सैन्याचे नेतृत्व केले होते. असे करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या.
त्यांचा लष्करी वारसा त्यांच्या घरातूनच आहे. त्यांच्या आजोबांनी सैन्यात सेवा बजावली होती, तर त्यांचे पतीदेखील मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमध्ये अधिकारी आहेत. कर्नल सोफिया यांनी स्पष्ट सांगितले की, “पाकिस्तान आणि POK मध्ये तीन दशकांपासून दहशतवादी तळ वाढवत आले आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने त्या तळांचा पूर्ण खात्मा केला आहे.”

कोण आहेत विंग कमांडर व्योमिका सिंह?
विंग कमांडर व्योमिका सिंह या भारतीय वायुसेनेतील हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांना अडीच हजार तासांपेक्षा जास्त विमान उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांनी ईशान्य भारतातील दुर्गम भागांत आणि जम्मू-काश्मीरमध्ये चेतक व चित्ता हेलिकॉप्टर उडवत अनेक बचावकार्यांमध्ये भाग घेतला आहे.
२०२० मध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशमधील कठीण बचाव मोहिमेचे नेतृत्व केले होते. पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, “‘ऑपरेशन सिंदूर’ राबवताना आम्ही अशा ठिकाणांची निवड केली जिथे नागरिकांना कोणतीही इजा होणार नाही. आमचं लक्ष्य केवळ दहशतवादी ठिकाणं होती आणि ती यशस्वीपणे नष्ट करण्यात आली.”

ऑपरेशन सिंदूर – दहशतवाद्यांना दिले प्रत्युत्तर
‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एक सैनिकी कारवाई नव्हती, ती होती भारताच्या सहनशीलतेची परिसीमा ओलांडल्यावर दिलेली ठोस प्रतिक्रिया. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हल्ले करून भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, भारत कुठल्याही हल्ल्याचा योग्य वेळी सडेतोड उत्तर देतोच.

महिला शक्तीचे प्रतिक – व्योमिका आणि सोफिया
या कारवाईच्या केंद्रस्थानी असलेल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह या केवळ सैनिकी अधिकारी नाहीत, तर भारताच्या नारीशक्तीचे प्रतिक आहेत. त्यांच्या धैर्याने आणि बुद्धिमत्तेने संपूर्ण देशाचे मन जिंकलं आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केवळ पाकिस्तानातील दहशतवाद्यांसाठी धडा नव्हती, तर जगालाही भारताच्या लष्करी क्षमतेचं भान देणारी मोहीम होती. सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांच्यासारख्या महिला अधिकारी जर अशा मोहिमेचे नेतृत्व करू शकतात, तर भारताचं भवितव्य निश्चितच सुरक्षित हातात आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

24 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

24 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago