News

एक देश, एक निवडणूक

“एक देश, एक निवडणूक” ही संकल्पना भारतीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे आणि विकासकामांना गती देणे आहे. एक देश, एक निवडणूक हे धोरण जर राबवलं गेलं तर त्याचे काही फायदे आणि तोटे आहेत ते नेमके कोणते हे आपण आता बघुयात.

फायदे

-खर्च कमी करणे: एकाच वेळी निवडणुका झाल्यास निवडणूक खर्च कमी होईल. हे सरकारसाठी आणि पक्षांसाठी फायदेशीर ठरेल.

विकासकामांची गती: सततच्या निवडणुकांमुळे विकासकामे थांबतात. एकाच वेळी निवडणुका झाल्यास, सरकारला कामे पूर्ण करण्यास अधिक वेळ मिळेल.

-राजकीय स्थिरता: एकत्रित निवडणुका झाल्यास सरकार स्थिर राहण्याची शक्यता वाढते, ज्यामुळे दीर्घकालीन धोरणे राबवता येतील.

तोटे

-राजकीय विविधता कमी होणे: विविध राज्यांमध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागतो. एकाच वेळी निवडणुका झाल्यास स्थानिक मुद्दे मागे पडू शकतात.

-सामाजिक असंतोष: काही राज्यांमध्ये स्थानिक राजकीय वातावरण भिन्न असू शकते, त्यामुळे सर्वत्र समान धोरण राबवणे कठीण होईल.

-संविधानिक आव्हाने: या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी संविधानात बदल आवश्यक आहे, त्यामुळे याला विरोधकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.

एक देश, एक निवडणूक ही संकल्पना अनेक फायदे आणि तोटे घेऊन येते. या प्रक्रियेत भारतीय राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडवण्याची क्षमता आहे, परंतु यासाठी सर्व पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. आगामी काळात या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होईल त्यावेळी आपल्याला या धोरणाचं काय होतंय ते कळेलच. तोपर्यंत तुम्हाला या One Nation One Election  बद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Admin

Recent Posts

धनंजय मुंडे यांचा राजीनामा: राजकीय भूकंप की नैतिक जबाबदारी?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि…

6 days ago

”प्रेक्षक मला मारायला निघालेत”… छावा मधल्या भूमिकेनंतर सारंग साठ्ये संकटात?

सध्या सर्वत्र विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमात मराठी आणि हिंदी कलाकारांची…

2 weeks ago

MahaKumbh 2025 : महाशिवरात्रीनिमित्त अंतिम शाही स्नानात भक्तांचा महासागर…

आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी, प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा अंतिम शाही स्नान सोहळा अत्यंत उत्साहात…

2 weeks ago

पु.ल.देशपांडे कला अकादमी पुन्हा कलावंतांच्या सेवेत दाखल होणार – २८ फेब्रुवारीला भव्य उद्घाटन!

मुंबईतील रंगभूमीचा एक अनमोल ठेवा – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता नूतनीकरणानंतर नव्या…

2 weeks ago

भोकणी गावाची ‘प्लास्टिक द्या, साखर घ्या’ मोहीम: पर्यावरण रक्षणाची अनोखी शक्कल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने पर्यावरण रक्षणासाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. 'प्लास्टिक…

2 weeks ago

पिंगुळी लोककला महोत्सव २०२५: ठाकर समाजाच्या सांस्कृतिक वारशाची मेजवानी!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावात प्रथमच 'पिंगुळी लोककला महोत्सव २०२५' रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…

2 weeks ago