Nyos lake disaster that erupted and killed thousands – २१ ऑगस्ट, १९८६ ची ती रात्र… आणि झोपेतच १७०० लोक आणि ३५०० जनावरांचा मृत्यू झाला… झाडं-इमारती जशाच्या तशा होत्या पण लोकांच्या मृतदेहांचा खच पडलेला… ही घटना जगातील सर्वात भयावह नैसर्गिक वायू दुर्घटनांपैकी एक ठरली… ती म्हणजे मृत्यूचं दार-नरकाचं द्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्योस ज्वालामुखी तलावाची..
१९८६ च्या त्या रात्री, आफ्रिकेतील कॅमेरूनच्या उत्तर-पश्चिम भागातील न्योस नावाच्या ज्वालामुखी तलावातून लिम्निक इरप्शनमुळे अचानक मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साइडचा ढग तयार झाला. कार्बन डायऑक्साइड जड असल्यामुळे हा ढग जमिनीवर पसरला. काही मिनिटांतच तलावाच्या आसपासची खेडी या अदृश्य वायूच्या ढगाखाली झाकली गेली.
यामुळे गुदमरून १,७४६ लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३,५०० जनावरे ठार झाली. ही घटना इतकी अचानक घडली की, अनेकजण झोपेतच मृत्यूमुखी पडले. कोणतीही इमारत किंवा झाड मोडले नव्हते, परंतु, शांत रात्री शांततेचं मृत्यूचा थरार झालेला..
न्योस तलाव हा ज्वालामुखी क्रेटर लेक आहे. तलावाच्या तळाशी ज्वालामुखीमुळे कार्बन डायऑक्साइड सतत तयार होत असते. साधारणपणे हा वायू तलावाच्या पाण्यात विरघळून राहतो. पण १९८६ मध्ये भूकंप, भूस्खलन किंवा पाण्याच्या तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे, तलावातील पाण्याचे थर उलटे झाले (limnic eruption). त्यामुळे तळाशी साचलेला वायू प्रचंड प्रमाणात वर आला आणि स्फोटासारखा बाहेर पडला. हा वायू जमिनीलगतच्या भागातून सुमारे २५ किमी परिसरात पसरला… हा वायू रंगहीन आणि गंधहीन असतो. परंतु, तिथल्या लोकांना सल्फर-कुजक्या अंड्यांसारखा वास लोकांना येऊ लागला. आणि काही तासात लोक आणि जनावरं तडफडून मेली, तर काहींना पॅरालिसिस चा अटॅक आला , श्वसनाचा त्रास होऊ लागला, स्ट्रोक्स आले. या घटनेने अनेक लोकांना मानसिक आघातही झाला..
दुर्मीळ नैसर्गिक आपत्तीत २१ ऑगस्ट, १९८६ची ही घटना नोंदवली जाते. असेच कोणते इंटरेस्टिंग टॉपिक्स तुम्हाला बघायला आवडतील हे आम्हाला कमेंट करून सांगा…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…