proposes-upi-cash-withdrawal-at-business-correspondent-outlets
UPI Cash Withdrawal : आपल्याला कॅश काढायची असेल, तर बँक किंवा एटीएम मशीनशिवाय पर्याय नसतो. कधीकधी ऐनगरजेच्या वेळी एटीएम मशीन्स उपलब्धदेखील नसतात. डिजिटल व्यवहाराचा पर्याय नाही आणि कॅशही मिळत नाही, अशी परिस्थिती आपल्यावर अनेक वेळा येते. काही दुर्गम भागात अजूनही एटीएम मशीन्स पोहोचलेल्याही नाहीत. मात्र, ही चिंता आता कायमची मिटणार आहे.
स्मार्टफोनद्वारे रोख रक्कम काढणे आता आणखी सोपे होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दिशेने मोठी तयारी करत आहे. एका अहवालानुसार, लवकरच देशभरातील २० लाखांहून अधिक बिझनेस करस्पॉंडंट आउटलेट्सवर युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे पैसे काढता येणार आहेत. यासाठी NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (आरबीआय) मंजुरी मागितली आहे.
बिझनेस करस्पॉंडंट म्हणजे काय?
बिझनेस करस्पॉंडंट म्हणजे असे स्थानिक प्रतिनिधी जे दुर्गम भागांमध्ये बँकिंग सेवा पुरवतात, जिथे एटीएम किंवा बँकेच्या शाखा उपलब्ध नाहीत. हे स्थानिक प्रतिनिधी दुकानदार, स्वयंसेवी संस्था किंवा कोणतीही व्यक्ती असू शकते. सध्या लोक आधार-आधारित प्रमाणीकरण किंवा डेबिट कार्ड वापरून मायक्रो एटीएमद्वारे बीसी पॉइंट्सवरून पैसे काढतात.
व्यवहार कसा होईल?
या योजनेनुसार, या बीसी आऊटलेट्सवर ग्राहक त्यांच्या स्मार्टफोनवरील कोणत्याही UPI ॲपचा वापर करून QR कोड स्कॅन करून रोख रक्कम काढू शकतील. या व्यवहाराची मर्यादा प्रति ट्रान्झॅक्शन १०,००० रुपयांपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या निवडक ठिकाणीच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या नव्या प्रणालीचा फायदा अशा ग्राहकांना होईल, ज्यांना फिंगरप्रिंट प्रमाणीकरणात अडचणी येतात किंवा ज्यांना डेबिट कार्ड वापरणे सोयीस्कर वाटत नाही. हे एक मोठे पाऊल आहे, जे बँकिंग सेवा अधिक सोयीस्कर बनवेल. एनपीसीआयने २०१६ मध्ये UPI लाँच केले होते आणि हे नवीन पाऊल त्याचाच विस्तार मानला जात आहे.
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…
Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…
१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…
राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…