Random News

पतीचा मृत्यू की प्रेयसीचा कट? प्रेम, विश्वासघात आणि खूनाची थरारक कहाणी!

औरैया जिल्ह्यातील एका शांत गावात घडलेला भयानक खून सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांत एका नवविवाहित तरुणाची हत्या त्याच्याच पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

मैनपुरी जिल्ह्यातील दिलीप आणि औरैया जिल्ह्यातील प्रगती यांचा विवाह ५ मार्च २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. मात्र या नव्या संसारामागे एका भयानक कट लपला होता. लग्नाच्या आधीपासूनच प्रगती आणि अनुराग नावाच्या तरुणामध्ये प्रेमसंबंध होते. चार वर्षांच्या या नात्यामुळे प्रगती अनुरागच्या प्रेमात अडकलेली होती. घरच्यांचा विरोध असल्यामुळे तिने दिलीपसोबत लग्न केलं, पण तिचं मन अजूनही अनुरागकडेच होतं.

प्रगतीने तिच्या प्रियकरासोबत मिळून दिलीपला संपवण्याचं ठरवलं. १९ मार्च रोजी दिलीप कन्नौजहून परत येत असताना, त्याला कालव्याजवळ एका हॉटेलमध्ये थांबवण्यात आलं. तेथून त्याला एका निर्जन ठिकाणी नेऊन शूटरच्या सहाय्याने गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी खुलासा केला की, प्रगतीने लग्नाच्या आहेरातून मिळालेल्या पैशांतून २ लाख रुपये शूटरला दिले होते. तिने हे पैसे प्रथम अनुरागकडे दिले, ज्याने ते शूटरपर्यंत पोहोचवले. हत्येच्या पाठीमागे प्रगती आणि अनुरागचं नियोजन असल्याचं स्पष्ट झालं. प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांनी प्रगती, तिचा प्रियकर अनुराग आणि एका शूटरला अटक केली आहे. चौकशीदरम्यान प्रगतीने आपल्या पतीच्या हत्येचा कट रचल्याची कबुली दिली. दिलीप हा तिच्या आणि अनुरागच्या प्रेमसंबंधांमधला अडथळा असल्याचं तिने सांगितलं.

प्रगती आणि अनुरागच्या या भयानक कटाने संपूर्ण समाजाला हादरवून सोडलं आहे. एका साध्या लग्नाच्या मागे असा भीषण कट रचला जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. या प्रकरणाने नात्यांमधील विश्वासघाताचं एक भयंकर स्वरूप समोर आणलं आहे. या घटनेने माणुसकी, नातेसंबंध, आणि प्रेम यावर विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण केला आहे – माणूस आपल्या इच्छांसाठी इतका क्रूर होऊ शकतो का?

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

1 day ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

1 day ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago