Random News

निसर्गाचा रुद्रावतार! म्यानमार-थायलंड भूकंपाने हादरले

२८ मार्च २०२५ रोजी म्यानमार आणि थायलंडमध्ये जमिनीत मोठा हादरा बसला. रिश्टर स्केलवर ७.७ आणि ६.४ तीव्रतेच्या दोन भूकंपांच्या धक्क्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेलं. या भूकंपाचे केंद्र म्यानमारच्या सागाइंग भागात, शहरापासून अवघ्या १६ किमी अंतरावर होते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, या भूकंपाची खोली १० किलोमीटर होती. त्याचा प्रभाव इतका जबरदस्त होता की त्याचे झटके थायलंडच्या बँकाँकपर्यंत जाणवले. परिणामी, २६ डिसेंबर २००४ रोजी थायलंडला आलेल्या विनाशकारी त्सुनामीच्या आठवणी जाग्या झाल्या.

पृथ्वीच्या आत खोलवर सतत हालचाल करणाऱ्या टेक्टॉनिक प्लेट्सचं अस्तित्व हा भूकंपाचा प्रमुख कारणीभूत घटक आहे. या प्लेट्स जेव्हा एकमेकांवर धडकतात किंवा घसरतात, तेव्हा मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते आणि भूकंप होतो. म्यानमारच्या सागाइंग भागामध्ये भारत आणि ब्रह्मदेशाच्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या सीमा एकमेकांना भिडतात. हा भूभाग भूकंपासाठी अत्यंत संवेदनशील असून, येथे सुमारे १२०० किलोमीटर लांबीची फॉल्टलाइन आहे. त्यामुळे हा परिसर नेहमीच अशा नैसर्गिक संकटांच्या उंबरठ्यावर असतो.

हा पहिलाच मोठा भूकंप नाही. इतिहास पाहता, १९४६ मध्ये याच भागात ७.७ तीव्रतेचा, तर २०१२ मध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यामुळे या भूप्रदेशाला भूकंपांचा मोठा इतिहास आहे. या भूकंपानंतर इमारती कोसळल्याचे, पूल ढासळल्याचे आणि लोकांमध्ये पसरलेल्या दहशतीचे दृश्य सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.

संशोधनानुसार, जमिनीखालील टेक्टॉनिक प्लेट्स दरवर्षी ११ मिमी ते १८ मिमीपर्यंत सरकत असतात. हा हळूहळू होणारा बदल एक दिवस अचानक प्रचंड शक्तीने बाहेर येतो आणि महाविनाशकारी भूकंप होतो. म्यानमारमधील हा भूकंप हीच प्रक्रिया असल्याचे भूगर्भशास्त्रज्ञ सांगतात.
भूकंप किती विध्वंसक ठरेल, हे निश्चित सांगणं कठीण आहे. टेक्टॉनिक प्लेट्समध्ये जसजसा ताण वाढतो, तसतसे भूकंपांचे प्रमाण आणि तीव्रता वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्यानमार आणि थायलंडसाठी हा इशारा आहे.

या भूकंपाने पुन्हा एकदा मानवाला निसर्गाच्या अपार शक्तीची आठवण करून दिली आहे. अशा आपत्तींसाठी योग्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि सतत जनजागृती करणे आवश्यक आहे. आपण याकडे फक्त एक घडलेली घटना म्हणून पाहणार, की यापासून शिकून भविष्यातील आपत्तींच्या तयारीसाठी सज्ज होणार? हा निर्णय आता आपल्या हातात आहे!

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

22 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

22 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago