Sports

Woman Cricket : मराठी स्त्री, कराड आणि महिला क्रिकेटची सुरुवात!

आज जेव्हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा जयघोष जगभर ऐकू येतो, जेव्हा २०२५ च्या विश्वचषकाच्या (World Cup 2025) विजयाची चर्चा होते, तेव्हा या इतिहासाच्या मुळाशी असलेल्या एका विलक्षण नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे ते नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांच्या मातोश्री माजी खासदार प्रेमलाकाकी चव्हाण.

१९७० च्या दशकात, भारतीय समाजात महिलांनी क्रिकेट खेळावे, ही कल्पनाच वेडेपणाची मानली जाई. ‘चूल आणि मूल’ हीच महिलांची सीमा आहे, हा विचार समाजात रुढ असताना, प्रेमलाकाकींनी एक क्रांतीकारी पाऊल उचलले.
प्रेमलाकाकींच्या यांच्या धाडसी निर्णयामुळेच भारतीय महिला क्रिकेटचा प्रवास सुरु झाला.१९७० चा दशक. भारतात महिलांनी ‘पुरुषांचे खेळ’ खेळणे, विशेषतः क्रिकेट खेळणे, ही कल्पना समाजाला पचायला कठीण होती. या खेळाडूंना प्रोत्साहन नाही, मैदान नाही, पैसा नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक पाठिंबाही नव्हता. अशा प्रतिकूल वातावरणात, खासदार असलेल्या प्रेमलाकाकींनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला.१९७३ साली त्यांनी ‘ऑल इंडिया वुमेन्स क्रिकेट असोसिएशन’ (AIWCA) ची स्थापना केली. त्यावेळी महिला खेळाडूंसाठी लढणे सोपे नव्हते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (त्यांचे चिरंजीव) सांगतात, खेळाडूंकडे प्रवासासाठी पैसे नसायचे, राहायला जागा नसायची. तेव्हा प्रेमलाकाकींनी महत्त्वाची भूमिका बजावली.अनेकदा खेळाडूंनी हॉटेल्सऐवजी त्यांच्या निवासस्थानी मुक्काम केला. काकींनी स्वतःच्या राजकीय प्रभावाचा उपयोग महिला क्रिकेटसाठी निधी आणि सुविधा मिळवून देण्यासाठी केला.

प्रेमलाकाकींच्या प्रयत्नांमुळे भारतीय महिला क्रिकेटने मोठे टप्पे गाठले:

पहिली आंतरराष्ट्रीय मालिका (१९७५): WCAI च्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षांत, ऑस्ट्रेलियाच्या संघासोबत भारताने आपली पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आयोजित केली.

पहिला कसोटी विजय (१९७६): यानंतर लवकरच भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत आपला पहिला आंतरराष्ट्रीय विजय नोंदवला.

पहिला महिला विश्वचषक (१९७८): सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रेमलाकाकींच्या नेतृत्वाखाली WCAI ने १९७८ चा महिला क्रिकेट विश्वचषक भारतात आयोजित केला. हा त्या काळात एक जागतिक विक्रम होता, ज्यामुळे भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

कालांतराने WCAI चे विलीनीकरण BCCI मध्ये झाले आणि महिला क्रिकेटला अधिक व्यावसायिक रूप मिळाले. आज खेळाडूंना मिळणारे सामने, मानधन, प्रायोजकत्व आणि ‘वुमन्स प्रीमियर लीग’ (WPL) सारखे व्यासपीठ… या प्रत्येक यशाच्या पायाभरणीत प्रेमलाकाकींच्या त्या १९७३ मधील एका धाडसी निर्णयाचे श्रेय दडलेले आहे.

Team Jabari Khabari

Share
Published by
Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

15 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

15 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

1 day ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago