Random News

Maharashtra Election: VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान घेण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा विविध स्तरांवरील निवडणुकांची प्रक्रिया दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या अखेरीस होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचे ही सांगण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयुक्त रमेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मनुष्यबळाची कमतरता असल्याने या निवडणुका एकाच टप्प्यात न घेता टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. मात्र कोणत्या स्तरावरील निवडणुका आधी घेतल्या जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार नाही, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग पद्धतीमुळे मतदारांना एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणून द्यायचे असतात. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर अशक्य असतो. ज्या ठिकाणी एकाच उमेदवाराची निवड होणार असते, तिथेच व्हीव्हीपॅटचा वापर शक्य असतो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये मतमोजणीसाठी ईव्हीएम मशीनचाच(EVM) वापर केला जाणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत आणखी एक महत्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, राज्यात 27 टक्के OBC आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निर्णयाअंतर्गत, 2022 मधील जुन्या प्रभाग रचनेनुसार व OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे OBC समाजामध्येही आनंदाचे वातावरण आहे.

राज्य सरकारने चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना जाहीर करावी आणि चार महिन्यांच्या आत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे. त्यानंतर लवकरच राज्यातील 29 महापालिका, 290 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 335 पंचायत समित्यांमध्ये निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

22 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

22 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago