महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी पैलवान आहे.: तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू म्हणून ओळखला जातो.सिकंदर शेख हा २०२४ चा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आहे. यापूर्वी, २०२३ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती गटातील अंतिम लढतीत पंचांच्या निर्णयामुळे वाद निर्माण झाला होता, ज्यामुळे सोशल मीडियावर सिकंदरला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला होता. मात्र तोच महाराष्ट्र केसरी वादात सापडलाय. सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करीच्या आरोपाखाली अटक केली.पंजाबमधील मोहाली येथे ही कारवाई करण्यात आली. सिकंदर शेखवर हरियाणा आणि राजस्थानमधील कुख्यात ‘पपला गुर्जर’ टोळीशी संबंध असल्याचा आणि त्यांना अवैध शस्त्रांचा पुरवठा केल्याचा गंभीर आरोप पंजाब पोलिसांनी लावला आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिकंदर उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून पंजाब आणि आसपासच्या परिसरात पुरवत होता.सिकंदरने स्वतःच्या प्रतिमेचा वापर शस्त्र विक्रीसाठी केला होता, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.मोहाली येथील खरड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून पाच अवैध पिस्तुलं, काडतुसे आणि दोन आलिशान गाड्या जप्त केल्या.

सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी पंजाब पोलिसांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझ्या मुलाला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. एका गरीब परिस्थितीत जीवन जगत असताना त्यांचा मुलगा असा गुन्हा करू शकत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे.महाराष्ट्र केसरी उपविजेता राजेंद्र लोणारी यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी हा ‘सुनियोजित कट’ असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ‘हिंद केसरी’ स्पर्धेतून सिकंदरला बाद करण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले असावे, असे मत अनेकांनी मांडले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात पंजाबच्या मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी बोलून सिकंदरच्या कुटुंबाला मदत करण्याची विनंती केली होती.

या प्रयत्नानंतर आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर सिकंदर शेखला जामीन मंजूर झाला आहे, तर त्याच्यासोबत अटक झालेल्या इतर आरोपींना जामीन मिळालेला नाही.

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखची अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात झालेली अटक, तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पैलवान असल्याने अधिकच चर्चेचा विषय ठरली. कुस्तीच्या रिंगणातून बाहेर पडून अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव आल्याने त्याच्या कारकिर्दीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी आणि न्यायालयीन कार्यवाही काय दिशा घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

18 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

18 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago