Random News

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

राज्यातील सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी वांद्रे (पूर्व) येथे राज्याचे नवे “महाराष्ट्र पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली.

मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयाची स्थापना १८२१ साली करण्यात आली होती. संचालनालयाचे मुख्यालय सध्या मुंबईतील कावसजी रेडी मनी बिल्डिंग (एल्फिस्टन कॉलेज) आहे. येथे १८८९ पासून पुराभिलेख विभागाकडे असलेल्या तब्बल १७.५ कोटी कागदपत्रांपैकी सुमारे १०.५ कोटी कागदपत्रांचे जतन आणि संवर्धन करण्यात येते.

मात्र, काळानुरूप कागदपत्रांचे अत्याधुनिक पद्धतीने जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच पुरेशी जागा नसल्यामुळे अनेक अडचणी येत असल्याचे मंत्री शेलार यांनी अधोरेखित केले. या सर्व अडचणींवर उपाय म्हणून वांद्रे (पू.) येथील ६,६९१ चौ. मी. जागेवर अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज “महाराष्ट्र पुराभिलेख भवन” उभारण्यात येणार आहे.

या नव्या भवनामध्ये तापमान व आर्द्रता नियंत्रित अभिलेख कक्ष, स्वतंत्र बांधणी शाखा, प्रतिचित्रण शाखा तसेच देश-विदेशातून येणाऱ्या संशोधकांसाठी अत्याधुनिक संशोधन कक्ष आणि स्वतंत्र प्रदर्शन दालन असेल. ऐतिहासिक कागदपत्रांच्या राष्ट्रीय महत्त्वाच्या ठेव्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने ही इमारत अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

यापूर्वी बीकेसी परिसरात स्वतंत्र राज्य वस्तूसंग्रहालय आणि कला भवन उभारण्याची घोषणा मंत्री शेलार यांनी केली होती. या घोषणेनंतर वांद्रे (पू.) येथे “महाराष्ट्र पुराभिलेख भवन” उभारणीची घोषणा करत त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

24 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

24 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago