News

तृतीयपंथीयांच्या मुजोरीचा कळस! मध्य प्रदेशात तरुणाची निर्घृण हत्या

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. केवळ पैसे दिले नाहीत म्हणून तृतीयपंथीयांच्या टोळीने एका तरुणाला भरधाव ट्रेनमधून बाहेर फेकून दिलं. ही घटना केवळ एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे.

२३ वर्षीय आदर्श विश्वकर्मा हा भोपाळमधील एका इलेक्ट्रिकल दुकानात काम करत होता. रोजप्रमाणे तो १३ मार्चला संध्याकाळी गोंडवाना एक्स्प्रेसने गंजबसोदा स्टेशनकडे निघाला. ट्रेनमध्ये गर्दी होतीच. ट्रेन सलामतपूर स्थानकाजवळ पोहोचली आणि त्याच वेळी ८-१० तृतीयपंथीय डब्यात शिरले. त्यांनी प्रवाशांकडून जबरदस्तीने पैसे मागायला सुरुवात केली.

आदर्शने पैसे द्यायला नकार दिला, तेव्हा एका तृतीयपंथीयाने त्याच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला. आदर्शने त्याचा विरोध केला आणि इथेच भांडण सुरू झालं. त्या टोळीने आदर्शला बेदम मारहाण केली. त्याला लोळवून तोंडावर, पोटावर लाथा मारल्या, अंगावर उड्या मारल्या. काही प्रवाशांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण बहुतांश लोक बघ्याची भूमिका घेत होते.

मारहाणीत आदर्श जबर जखमी झाला होता. विदिशा स्टेशन आल्यावरही त्या टोळीने त्याला बाहेर पडू दिलं नाही. अखेर, गंजबसोदा स्थानक येताच त्या तृतीयपंथीयांनी त्याला सरळ ट्रेनमधून फेकून दिलं. तो जागीच ठार झाला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह तब्बल १२ तास रेल्वे रुळांजवळ पडून होता. दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. समाज आणि प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ही केवळ एक घटना नाही, संपूर्ण देशभरात तृतीयपंथीयांच्या काही टोळ्या लोकांना अशाच प्रकारे त्रास देत आहेत.
मुंबई लोकलमध्ये प्रवाशांवर ब्लेडने हल्ले करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. कल्याणमध्ये चार तृतीयपंथीयांनी एका महिलेला आणि तिच्या लहान मुलांना मारहाण केली. काही महिन्यांपूर्वी मुंबईतच एका ट्रॅफिक पोलिसाला तृतीयपंथीयांनी मारहाण केली होती.

लोकं हे सगळं गप्प बसून बघत आहेत, पण यावर आळा कधी बसणार, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

समाज तृतीयपंथीयांचा सन्मान करतो, पण अशा घटना वाढल्या तर त्याचा विपरीत परिणाम संपूर्ण समाजावर होईल. अनेक ठिकाणी असेही समोर आले आहे की, तृतीयपंथीयांच्या नावाखाली काही पुरुष या टोळ्यांमध्ये सामील होऊन लोकांना त्रास देत आहेत. त्यामुळे सरकार आणि प्रशासनाने यावर तातडीने कारवाई केली नाही, तर येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर जाईल.

तुमच्या मते, सरकारने यावर कोणती ठोस पावलं उचलली पाहिजेत? हे आम्हाला जरूर कळवा.

Team Jabari Khabari

Recent Posts

“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…

3 days ago

Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…

3 days ago

ट्रम्प यांनी भारतावर लादले कठोर टॅरिफ! रशियासोबत व्यवहाराचा फटका?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…

4 days ago

Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…

5 days ago

जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…

5 days ago

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…

6 days ago