Random News

“विनोद की विखार? कुणाल कामरावर मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक!”

“स्टँडअप ची सीमा ओलांडली? कुणाल कामराच्या टीकेवर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर!”

वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. कामराने आपल्या कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी धुडगूस घालत तोडफोड केली, तर दुसरीकडे कुणाल कामराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आणि माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन अपमानास्पद टीका करणाऱ्या लोकांना धडा शिकवला जाईल.

विधानसभेतील फडणवीसांचे परखड वक्तव्य

विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी सांगितले,

“स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते, आम्ही त्याला दादही देतो. पण सुपारी घेऊन कोणी अपमानित करत असेल तर ते सहन केले जाणार नाही. महाराष्ट्रात स्वातंत्र्याचा स्वैराचार सहन केला जाणार नाही. कोणीही कितीही दबाव आणला तरी कठोर कारवाई केली जाईल.”

तसेच, फडणवीस यांनी कामराच्या विचारसरणीवर टीका करत त्याला ‘अर्बन नक्षल’ असे संबोधले. ते म्हणाले, “डाव्या विचारसरणीचे लोक, जे देशातील संस्था आणि व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करण्याचे काम करतात, त्यांना सोडणार नाही.”

माध्यमांशी बोलताना फडणवीसांचे परखड मत

माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कुणाल कामराला धारेवर धरले. त्यांनी सांगितले,

“कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे, हे २०२४ च्या निवडणुकीत जनतेने स्पष्ट केले आहे. तुम्ही विनोद करा, व्यंग करू शकता, पण अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर सहन केला जाणार नाही.”

फडणवीस पुढे म्हणाले,

“कामराने संविधानाचे पुस्तक दाखवले, पण ते जर त्याने खरेच वाचले असेल तर त्यातच लिहिले आहे की कोणाच्याही स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे कामराने त्वरित माफी मागावी.”

कुणाल कामराचा वादग्रस्त इतिहास

कुणाल कामरा हा आपल्या तिखट राजकीय व्यंगासाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही त्याने अनेकदा भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली आहे. त्याच्या काही मोठ्या वादग्रस्त घटनांमध्ये पुढील बाबी समाविष्ट आहेत –

  1. सुप्रीम कोर्टावर टीका (२०२०) – कामराने सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयावर सवाल उपस्थित करत त्यांच्यावर टीका केली. यामुळे त्याच्यावर न्यायालय अवमान प्रकरण दाखल झाले होते.
  2. अर्णब गोस्वामी प्रकरण (२०१९) – कुणाल कामराने एका विमान प्रवासादरम्यान पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर जोरदार टीका केली. या घटनेमुळे इंडिगो, एअर इंडिया यांसारख्या विमान कंपन्यांनी त्याच्यावर उड्डाण बंदी घातली होती.
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका – आपल्या स्टँडअप शो आणि सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे कामरा अनेकदा पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका करत आला आहे.

राजकीय वाद अजून तीव्र होणार?

कुणाल कामराच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले असून, फडणवीस यांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत. यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. “स्टँडअप कॉमेडी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामधील सीमारेषा नक्की कशी ठरणार? हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

22 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

22 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago