News

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र होते, नर्सेस अर्थात परिचारिकाही रुग्णसेवेत गढलेल्या होत्या… एरवीही दिसणारे हे चित्र…. त्या सकाळी मात्र काही क्षणांतच पार बदलून गेले. रुग्णालयाच्या त्या वॉर्डमध्ये गोळ्यांचा वर्षाव झाला. अवघ्या काही सेकंदात ३३ गोळ्या झाडल्या गेल्या आणि संपूर्ण मुंबई या हत्याकांडाने हादरली.

Tulsi Vivah2025:गणेशाच्या शापामुळे राक्षसाशी झालेलं तुळशीचं लग्न!तरीही विष्णूंसह होतो तुळशीविवाह

पृथ्वीला मिळाला नवीन चांदोबा!नव्या अर्धचंद्राची गोष्ट वाचा सविस्तर

हळदणकरच्या हत्येसाठी…
पोलीस रेकॉर्डनुसार, अरुण गवळीचा विश्वासू साथीदार शैलेश हळदणकर मारेकऱ्यांचे लक्ष्य होता. हल्ल्याच्या काही दिवस आधीच एका चकमकीत तो जखमी झाला होता आणि पोलीस बंदोबस्तात त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हळदणकरच्या शेजारच्या खाटेवर गवळीचा आणखी एक साथीदार बिपीन शेरे हाही जखमी अवस्थेत दाखल होता. हळदणकरच्या जवळ दोन सशस्त्र पोलीस तैनात होते.

…आणि गोळीबार सुरू झाला
पोलिसांनी या प्रकरणी त्यावेळेस न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, त्या सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास काहीजण ‘हळदणकरला भेटायचंय’ असं सांगून वॉर्डमध्ये आत घुसले आणि क्षणभरातच त्यांनी स्वयंचलित बंदुका बाहेर काढून गोळीबार सुरू केला… हळदणकर आणि संरक्षणार्थ असलेले दोन्ही पोलीस या हल्ल्यात ठार झाले.

गुन्हेगारी जगतातील टोळीयुद्ध
पोलीस रेकॉर्डनुसार, गुन्हेगारी जगताचा इतिहास असे सांगतो की दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी पूर्वी एकत्रच काम करत होते. मात्र नंतर त्यांच्या टोळीमध्ये फूट पडली. ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात ही फूट वाढत दोघेही एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. एका बाजूस दगडी चाळ हे सत्ताबाह्य केंद्र उभे राहिले तर दुसरीकडे दाऊद दुबईतून मुंबईवर नियंत्रण ठेवून होता. संघर्षाची ठिणगी पडली ती, दाऊदचा मेव्हणा इब्राहिम पारकरच्या हत्येमुळे. पारकरच्या हत्येमागे गवळी टोळीच असल्याची दाऊदची शंका होती. त्याचा सूड उगवण्यासाठीच जेजे हत्याकांड घडवण्यात आलं, अशी माहिती तत्कालीन खटल्यामध्ये मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केली होती.

३२ वर्षांनंतर पुन्हा तपास, पुन्हा पुरावे
या खटल्यामध्ये काही जणांना शिक्षाही झाली. पण तरीही हे प्रकरण मुंबई पोलिसांची पाठ सोडत नाही, अशीच अवस्था आहे. गेल्याच वर्षी २०२४ साली ऑक्टोबर महिन्यात या प्रकरणात त्रिभुवन रामपती सिंग ऊर्फ श्रीकांत राय उर्फ प्रधान याला उत्तर प्रदेशात अटक झाली. या प्रकरणात तब्बल ३२ वर्षांनंतर झालेली ही अटक होती. मुंबई पोलिसांसाठी हे यश आणि आव्हान दोन्हीही आहे.अजूनही या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. अशा वेळेस या घटनेचा तब्बल ३२ वर्षांनंतर पुन्हा तपास करून, पुरावे गोळा करत आरोपीला शिक्षा होईल, अशा पद्धतीने खटला पुन्हा उभा करणे हे मुंबई पोलिसांसाठी आव्हानच असणार आहे.

Team Jabari Khabari

Recent Posts

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

22 minutes ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

18 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वाजणार बिगुल! राज्य निवडणूक आयोगाची मोठी अपडेट

राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदारांवरून…

2 days ago

World Cup 2025 च्या विजयामागील खरा हिरो कोण?

कधी काळी स्वतःला भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूने, आज भारताला विश्वविजेता बनवलं आहे. ही…

3 days ago

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांवरून राजकीय रणधुमाळी!

राज्यातील आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास…

3 days ago