News

भारत आणि पाकिस्तानची क्षेपणास्त्र व हवाई संरक्षण प्रणाली : कोण आहे किती सक्षम?

भारताने नुकत्याच ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर लक्षित हल्ले केले असून, त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. भारताने स्पष्ट केलं आहे की हे हल्ले दहशतवादी गटांवर करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी क्षमतांची चर्चा उफाळून आली असून विशेषतः क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण प्रणाली किती सक्षम आहे, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भारताची क्षेपणास्त्र क्षमता
भारताने गेल्या काही वर्षांत स्वतःची शस्त्रास्त्र आणि संरक्षण प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे. भारताकडे ‘अग्नी-5’ हे इंटरकॉंटिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) आहे, ज्याची मारक क्षमता तब्बल 5,000 ते 8,000 किलोमीटर पर्यंत आहे. ही क्षमता भारताला जागतिक पातळीवर अत्यंत मोजक्या देशांच्या यादीत स्थान देणारी ठरते. ‘अग्नी’ मालिका ही धोरणात्मक क्षेपणास्त्रांची मालिका असून त्यात आण्विक शस्त्रास्त्र वाहून नेण्याचीही क्षमता आहे. भारताने ब्राह्मोस आणि ब्राह्मोस-2 ही सुपरसोनिक आणि हायपरसोनिक क्रूझ मिसाईल्स रशियासोबत मिळून विकसित केली असून, ही क्षेपणास्त्रं जमिनीवर, हवेत, समुद्रातून आणि जहाजांवरून सुद्धा प्रक्षेपित केली जाऊ शकतात. या क्षेपणास्त्रांची गती आणि अचूकता दोन्ही अतुलनीय आहे.
भारताकडे केवळ आक्रमक क्षेपणास्त्र प्रणालीच नाही, तर त्याला उत्तर देण्याची सक्षम संरक्षण प्रणाली देखील आहे. भारताची अँटी बॅलिस्टिक मिसाईल (ABM) प्रणाली दोन स्तरांवर कार्य करते – ‘पृथ्वी एअर डिफेन्स’ (PAD) ही उंचीवरून होणारे हल्ले रोखते, तर ‘अ‍ॅडव्हान्स एअर डिफेन्स’ (AAD) ही कमी उंचीवरील क्षेपणास्त्र हल्ले निष्फळ करते. या प्रणालीमुळे भारताच्या महत्त्वाच्या शहरांवर होणारे संभाव्य क्षेपणास्त्र हल्ले टाळण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. भारताने रशियाकडून मिळवलेली S-400 ही आधुनिक हवाई संरक्षण प्रणाली आणि स्वदेशी विकसित ‘आकाश’ यंत्रणा भारताचं हवाई संरक्षण अधिक सक्षम बनवत आहे.

पाकिस्तानची क्षेपणास्त्र क्षमता
पाकिस्तानने आपली क्षेपणास्त्र क्षमता मुख्यतः भारताच्या धोरण लक्षात घेऊन विकसित केली आहे. त्यांच्याकडे ‘शाहीन-3’ हे लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे, ज्याची मारक क्षमता 2,750 किलोमीटर आहे. याशिवाय पाकिस्तानकडे ‘गौरी’ आणि ‘बाबर’ ही आण्विक आणि पारंपरिक क्षेपणास्त्रं आहेत. या क्षेपणास्त्रांचं उद्दिष्ट भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी तळांवर आहे. पाकिस्तानने ही क्षेपणास्त्रं चीनच्या मदतीने विकसित केली असून, त्यांच्या क्षमता प्रादेशिक स्वरूपाच्या आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, पाकिस्तानकडे अजूनही ICBM क्षेपणास्त्र नाही. या गोष्टीमुळे पाकिस्तानची आंतरखंडीय हल्ला करण्याची क्षमता मर्यादित राहते. संरक्षण विश्लेषकांचं म्हणणं आहे की पाकिस्तानसाठी ICBM आवश्यक नाही, कारण त्यांचा मुख्य धोका भारतपुरता मर्यादित आहे. परंतु, भारतासारखी दूरगामी धोरणात्मक क्षमता पाकिस्तानकडे अद्याप नाही.

हवाई संरक्षण प्रणालीतील फरक
हवाई संरक्षणाच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या तुलनेत अधिक सक्षम आहे. भारताने S-400 ट्रायम्फ ही अत्याधुनिक रशियन प्रणाली तैनात केली आहे. ही प्रणाली 400 किलोमीटरपर्यंत हवाई हल्ले ओळखून त्यांना निष्फळ करु शकते. भारताची ‘आकाश’ प्रणालीही अल्प आणि मध्यम पल्ल्याच्या हवाई हल्ल्यांना रोखू शकते. याशिवाय, भारताने विकसित केलेली अँटी बॅलिस्टिक प्रणाली (PAD आणि AAD) भारताच्या महत्त्वाच्या शहरांना मिसाईल हल्ल्यांपासून संरक्षण देते.
पाकिस्तानकडे चीनी मदतीने मिळवलेली HQ-9BE हवाई संरक्षण प्रणाली आहे. ही प्रणाली काही प्रमाणात हल्ले थोपवू शकते, पण तिची क्षमता S-400 किंवा आकाश यंत्रणेसमोर मर्यादित आहे. पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेमध्ये अजूनही अचूकतेचा आणि गतीचा अभाव आहे, हे त्यांच्या लष्करी धोरणावरून लक्षात येते.

धोरणात्मक फरक आणि लष्करी भूमिका
भारताने आपली लष्करी धोरणं केवळ पाकिस्तानकडे लक्ष केंद्रित न करता चीनच्या संभाव्य धोक्यालाही लक्षात घेऊन तयार केली आहेत. त्यामुळे भारताकडील क्षेपणास्त्रं आणि संरक्षण प्रणाली दीर्घकालीन धोरणांच्या अनुषंगाने विकसित झाल्या आहेत. याउलट पाकिस्तानचे लष्करी निर्णय फक्त भारताच्या प्रतिसादावर आधारित असतात. त्यामुळे दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमध्ये भारत पाकिस्तानपेक्षा अधिक सक्षम आहे.
संरक्षण विश्लेषक राहुल बेदी यांचं म्हणणं आहे की, जर कधी ICBM वापरण्याची वेळ आली, तर दोन्ही देशांसाठी तो अत्यंत विनाशकारी ठरेल. त्यामुळे ICBM केवळ धोरणात्मक साधन म्हणून वापरले जाते. चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर भारताने अग्नी-5 विकसित केलं, तर पाकिस्तानला अशी गरज वाटलीच नाही.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्षेपणास्त्र आणि हवाई संरक्षण क्षमतांमध्ये स्पष्ट फरक आहे. भारताकडे ICBMपासून ते सुपरसोनिक क्रूझ मिसाईलपर्यंत सर्व आधुनिक क्षेपणास्त्रं उपलब्ध आहेत. याशिवाय, S-400, PAD, AAD, आणि आकाशसारख्या प्रभावी संरक्षण प्रणालींमुळे भारताचं हवाई कवच अधिक मजबूत झालं आहे. पाकिस्तानकडेही काही प्रमाणात आण्विक क्षेपणास्त्रं आणि संरक्षण प्रणाली असल्या तरी त्यांचं तंत्रज्ञान आणि कवच मर्यादित स्वरूपाचं आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताने आपल्याच क्षेत्रातून अचूक आणि धोरणात्मक हल्ला करून स्वतःच्या क्षेपणास्त्र क्षमतेचं एक उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. भविष्यातही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी तणावात अशा प्रकारच्या तांत्रिक क्षमतेची भूमिका निर्णायक ठरू शकते.

Team Jabari Khabari

Recent Posts

महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख कुस्तीच्या आखाड्यातून थेट पोलिस कोठडीत

मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असलेला सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत घडलेला एक गुणी…

29 minutes ago

Pune Murder 2025: पुण्यात ‘खून का बदला खून’ आंदेकर v/s कोमकर

Pune Gangmurder Case2025: पुण्यातील नाना पेठ परिसरात मूळ असलेल्या आंदेकर टोळीचा इतिहास सुमारे ४० वर्षांहून…

4 hours ago

Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!

Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून…

5 hours ago

Who is Zohran Mamdani:न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाच्या मुस्लीम व्यक्तीचा ठसा; कोण आहेत जोहरान ममदानी?

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये २०२५ च्या महापौरसाठीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी यांनी…

23 hours ago

JJ Hospital Shootout:मुंबईला हादरवणारे हत्याकांड! ३२ वर्षांनी येणार सत्य बाहेर

१२ सप्टेंबर १९९२. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात तो नेहमीसारखाच एक दिवस होता. डॉक्टर्स रुग्णांच्या तपासणीत व्यग्र…

23 hours ago

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

2 days ago