Categories: Random News

Mr. Perfect हवा आहे? हरतालिकेच्या दिवशी ‘या’ स्तोत्राचे पठण ठरेल फायदेशीर

हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याण व दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. असे म्हणतात की, या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती. यंदा २६ ऑगस्ट २०२५ रोजी हे व्रत साजरे केले जाईल.

विवाहेच्छुक मुलींनी का करावे हरतालिकेचे व्रत?
विवाहेच्छुक मुलींनी हरतालिकेचे व्रत करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. खरंतर, हरतालिकेच्या दिवशी विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्याच्या इच्छेने व्रत आणि पूजा करतात. त्याशिवाय विवाहेच्छुक मुली चांगल्या वराच्या प्राप्तीसाठीही हे व्रत करतात. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिकेचे विशेष महत्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. हरतालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते. हरतालिका व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही करू शकतात.

वटसावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत पूर्वी निर्जल ठेवले जायचे. परंतु, अलीकडच्या काळात हे व्रत फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन केले जाते. पौराणिक मान्यतेनुसार हरतालिकेचे व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते, अशीही मान्यता आहे.

व्रतासह केली जाते हरतालिकेची पूजा
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते. घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाचीदेखील पूजा केली जाते. तसेच हरितालिकेच्या कथेचे पठण केले जाते. त्यासह जर तुम्ही विवाहयोग्य असाल आणि अनेक कारणांमुळे तुमचा विवाह होण्यास अडथळे येत असतील, तर देवी पार्वतीचे आणखी एक स्तोत्र खूप प्रभावी मानले जाते, असं म्हणतात. या स्तोत्राच्या नियमित पठणाने अविवाहितांना सुयोग्य जोडीदार प्राप्त होतो, तसेच विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखमय राहते.

देवी पार्वतीचे प्रभावी स्तोत्र
उत्तम जोडीदार मिळावा, यासाठी नियमित देवी पार्वतीच्या ‘पार्वती पंचक’ स्तोत्राचे पठण करावे. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असून, त्यामुळे मनातील इच्छा लवकर पूर्ण होते. या स्तोत्राच्या नियमित पठणाने केवळ विवाहच नाही, तर आयुष्यात सुख, शांतीदेखील प्राप्त होते.

पार्वती पंचक स्तोत्राचे पठण कसे करावे?
धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी पार्वती पचंक स्तोत्र पठण करणे उत्तम मानले जाते. सकाळी लवकर उठून अंघोळ करून, स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दीप लावून या स्तोत्राचे पठण करावे. ते पठण करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये. यावेळी मन एकाग्र करावे. पठण झाल्यानंतर देवी पार्वतीला नैवेद्य अर्पण करावा

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

14 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

14 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

1 day ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago