Categories: Lifestyle

फास्टॅगचा मास्टर स्ट्रोक – फक्त १५रु टोल भरुन देशभर फिरा!

तुम्ही जर का नॅशनल हायवे ने प्रवास करीत असाल आणि तुम्हाला देशभर प्रवास करण्याची आवड असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलचे दर कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने नुकतीच ‘फास्टॅग वार्षिक पास योजना’ जाहीर केली आहे. दर काही किलोमीटरवर टोल देताना थांबावं लागतं, आणि प्रत्येक वेळी वॉलेटमधून ५०-१०० रुपयांची रक्कम कमी होताना पाहणं हे आता भूतकाळात जमा होणार आहे! चला तर मग या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया फास्टॅगचा मास्टर स्ट्रोक काय आहे तो!

फास्टॅग वार्षिक पास म्हणजे काय?
नवीन फास्टॅग वार्षिक पास ही योजना खासगी, बिगर व्यावसायिक वाहनधारकांसाठी आहे. या योजनेअंतर्गत वाहनचालक एका वर्षासाठी फक्त ३०००रु भरून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर (National Highways) २०० टोल नाके सहजपणे पार करू शकतात. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक टोल फेरीसाठी केवळ १५ रु इतकाच टोल आकारला जाईल. सध्याच्या टोल दरांशी तुलना करता हे नागरिकांच्या आर्थिक बचतीचं महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

या योजनेचे वैशिष्ट्ये
• वार्षिक शुल्क फक्त ३०००रु
• २०० टोल फेऱ्यांसाठी वैध
• फक्त खासगी, नॉन-कमर्शियल वाहनांसाठी
• देशभरातील NHAIच्या राष्ट्रीय महामार्गांवर लागू
• १५ ऑगस्टपासून योजना सुरु होणार
• फास्टॅगशी संलग्न RFID तंत्रज्ञानावर आधारित
• राज्य महामार्गांवर (State Highways) लागू नाही

फास्टॅग वार्षिक पास मिळवायचा कसा?
या पाससाठी 15 ऑगस्टपासून अर्ज करता येईल. ‘राजमार्ग यात्रा’ अ‍ॅप, NHAI किंवा परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवरून तो उपलब्ध असेल. एकदा पास घेतल्यानंतर तो पुढे रिन्यू (नूतनीकरण) देखील करता येऊ शकतो.

२०० फेऱ्यांचा अर्थ काय?
इथे ‘एक फेरी’ म्हणजे एका टोल नाक्यावरून एक वेळचा प्रवास. म्हणजेच, वर्षभरात २०० वेळा कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका पार करण्याची परवानगी मिळते. उदाहरणार्थ, जर एखाद्या टोलवर सरासरी ५०रु टोल आकारला जात असेल, तर २०० ट्रिपसाठी १०,०००रु टोल भरावा लागला असता. पण या पासमुळे तो खर्च केवळ ३,०००रु इतकाच होईल.

ही योजना नेमकी कुठे लागू होईल?
फास्टॅग वार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्गांवरच (NHs) लागू आहे. म्हणजेच, NH 3, NH 4, NH 6 अशा क्रमांक असलेल्या मार्गांवर याचा फायदा मिळेल. मात्र, राज्य महामार्गांवर (जसे की समृद्धी महामार्ग), ही योजना लागू होणार नाही.

या योजनेमागील उद्देश
• टोल नाक्यांवरील वाहतूक नियंत्रण
• रोख रकमेच्या देवाणघेवाणीतून होणारा वेळ वाचवणे
• डिजिटल पेमेंटला चालना
• प्रवास अधिक किफायतशीर आणि जलद करणे
• फास्टॅगशी संबंधित वाद कमी करणे

फास्टॅग वार्षिक पासचा कसा होतो वापर?
हा पास सध्याच्या फास्टॅग RFID प्रणालीसह संलग्न केला जाईल. एकदा पास सक्रिय झाला की, वाहन टोल नाक्यावर पोहोचल्यावर टोलची रक्कम आपल्या फास्टॅग अकाउंटमधून स्वयंचलितपणे वजा केली जाईल. 2022 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले होते की, दोन टोल नाक्यांमधील अंतर किमान 60 किलोमीटर असावं. हा नियम वाहनधारकांसाठी टोल माफ करण्यासाठी नाही, तर बेकायदेशीर टोल नाके थांबवण्यासाठी आहे.

भविष्यातील टोल प्रणालीत काय बदल?
सरकार आता बॅरियर-लेस टोलिंग सिस्टिम विकसित करत आहे. यात ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) वापरलं जाईल, ज्यामुळं टोल नाके उभे राहण्याची गरजच उरणार नाही. या प्रणालीची चाचणी निवडक हायवेजवर सुरू आहे. फास्टॅग वार्षिक पास योजना ही खासगी वाहनधारकांसाठी खरोखरच बचतीची आणि सोयीची योजना आहे. टोलवरील अनावश्यक खर्च आणि रांगा टाळण्यासोबतच, प्रवासात वेळ व पैसा दोन्हींची बचत होणार आहे. 15 ऑगस्टपासून ही योजना सुरु होत असल्याने, वेळेत नोंदणी करून आपला फास्टॅग वार्षिक पास मिळवा आणि देशभरात अधिक माफक दरात, झपाट्याने प्रवासाचा आनंद घ्या!

 

Team Jabari Khabari

Share
Published by
Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

16 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

17 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago