मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ यांचा कार्यकाळ २९ ऑगस्टला संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधान परिषद सभागृहात त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदी नेत्यांची भाषणे झाली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवेंबाबत आपल्या खास शैलीत भाषण करत शिवसेनेला चिमटे काढले. तसेच त्यांनी थेट सभागृहातच उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची ऑफर दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेजी आमचं सरकार २०२९ पर्यंत पक्कं आहे; तुम्ही यायला तयार असाल तर चर्चा करू शकतो. परंतु त्यावर आपण वेगळ्या पद्धतीने बोलू असे ते म्हटले. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…
मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…
दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…
वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…