Random News

डॉ. कृष्णस्वामी कस्तुरीरंगन : भारतीय अंतराळ विज्ञानाचे ज्ञानतेज हरपले!

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण – विज्ञानाकडे झुकणाऱ्या बुद्धिमत्तेची सुरुवात
२० ऑक्टोबर १९४० रोजी केरळमधील एर्नाकुलम येथे जन्मलेले डॉ. कस्तुरीरंगन लहानपणापासूनच बुद्धिमान आणि जिज्ञासू होते. माटुंग्यातील रामनारायण रुईया महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान विषयात ऑनर्ससह पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि १९७१ मध्ये अहमदाबाद येथील ‘फिजिकल रिसर्च लॅब’मध्ये नोकरी करत असताना प्रायोगिक उच्च ऊर्जा खगोलशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.
या शिक्षणप्रवासात त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवले नाही, तर विज्ञानाकडे पाहण्याची जागतिक दृष्टिकोन अंगीकारला. त्यांच्यातील प्रामाणिकपणा, शिस्त आणि जिज्ञासा ही त्यांची आजीवन ओळख राहिली.

इस्रोचा आत्मा – भारताच्या अंतराळयात्रेचे शिल्पकार
१९९४ ते २००३ हा काळ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) इतिहासातील सुवर्णपानांपैकी एक मानला जातो – आणि या काळाचे नेतृत्व होते डॉ. कस्तुरीरंगन यांच्याकडे. इस्रोच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी अनेक ऐतिहासिक मोहिमा यशस्वी केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली:
• ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) यशस्वीपणे प्रक्षिप्त झाले.
• जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) चा उपयोग सुरुवात झाली.
• INSAT-2 आणि IRS-1A/1B उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात पोहोचले.
• चांद्रयान-१ च्या संकल्पना आणि योजनांची बीजे त्यांच्या काळातच रोवली गेली.
• भारतातील पहिले ऑपरेशनल रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट IRS-1A चा देखील यशस्वी प्रक्षेपण झाला.
त्यांनी फक्त तांत्रिक बाजूच हाताळल्या नाहीत, तर भारताच्या अंतराळ क्षेत्रातील स्वयंपूर्णतेचा पाया रचला. त्यांनी देशाच्या विज्ञान धोरणात आत्मनिर्भरता आणि जागतिक स्पर्धा यांचा सुंदर समन्वय घडवून आणला.

शैक्षणिक धोरणात महत्त्वाची भूमिका – NEP 2020 चे शिल्पकार
इस्रोमधून निवृत्तीनंतरही डॉ. कस्तुरीरंगन यांचे योगदान थांबले नाही. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज, बंगलोर येथे संचालक म्हणून कार्य केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या रचनेत केंद्रीय भूमिका बजावली. हे धोरण भारतीय शिक्षण क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठीची मूलभूत पायाभरणी आहे. NEP 2020 अंतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारसरणी, नवोपक्रमशीलता, आणि मातृभाषेतील शिक्षणास प्राधान्य देण्याचा आग्रह धरला. शिक्षण केवळ प्रमाणपत्रासाठी नसून मानसिक समृद्धीसाठी असले पाहिजे, हा त्यांचा ठाम विश्वास होता.

अतुलनीय सन्मान आणि पुरस्कार – वैज्ञानिक क्षेत्रातील सर्वोच्च गौरव
डॉ. कस्तुरीरंगन यांच्या योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना:

• पद्मश्री (१९८२)
• पद्मभूषण (१९९२)
• पद्मविभूषण (२०००)
या तीनही नागरी सन्मानांनी गौरवले. त्याचबरोबर जागतिक स्तरावर:
• IAA Theodore von Karman Award (फ्रान्स)
• ISPRS ब्रोक मेडल
• आर्यभट्ट पदक – INSA
• विक्रम साराभाई अवॉर्ड
• शांती स्वरूप भटनागर पुरस्कार (अभियांत्रिकी क्षेत्रात)
असे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांनी प्राप्त केले. २०० हून अधिक शोधनिबंध आणि सहा ग्रंथांचे संपादन हे त्यांच्या विद्वत्तेचे जिवंत उदाहरण आहे.

एक शास्त्रज्ञ, एक शिक्षक, एक राष्ट्रभक्त
डॉ. कस्तुरीरंगन यांचे आयुष्य हे विज्ञान, शिक्षण, राष्ट्रसेवा आणि मानवतेच्या तत्त्वावर आधारित होते. त्यांनी अवकाशाकडे पाहणे हे केवळ तंत्रज्ञान नसून एक संस्कृती आहे, हे भारतीयांना शिकवले. त्यांच्या विचारांतून आणि कृतीतून “भारत विज्ञानात महासत्ता होऊ शकतो” ही जाणीव भारतीय मनात खोलवर रोवली गेली.

आज त्यांनी आपला सांसारिक प्रवास संपवला असला, तरी त्यांच्या कार्याचा प्रकाश अनंत काळ आपल्या देशाला मार्गदर्शन करत राहील. भारताच्या अंतराळ विज्ञान क्षेत्राला त्यांनी दिलेलं त्यांनी योगदान हे शाश्वत आहे.

त्यांच्या स्मृतींना हीच खरी आदरांजली ठरेल – जेव्हा नवा वैज्ञानिक, नवा शिक्षक, नवा विद्यार्थी त्यांच्यासारखं काहीतरी मोठं करायचं स्वप्न बाळगेल.

 

Team Jabari Khabari

Recent Posts

लग्न नको म्हणून रचला सिने स्टाईल प्लॅन; सापाची कात ठेवून प्रियकरासोबत काढला पळ

उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यात एक धक्कादायक आणि तितकाच फिल्मी प्रकार समोर आला आहे. लग्नापासून सुटका…

2 hours ago

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

1 day ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

1 day ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago