जर मुख्यमंत्रीचं सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेने कुणाकडे पाहायचं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी जनसुनावणीदरम्यान एका अज्ञात इसमाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात मुख्यमंत्र्यांचा हात धरत त्यांचे केस ओढले व त्यांच्या कानशीलात लगावली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी जनसुणावणीचा (जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी सुरू केलेला साप्ताहिक उपक्रम) सार्वजनिक कार्यक्रम सुरू होता. यावेळी एक तरूण आपली कागदपत्रे घेऊन मुख्यमंत्र्याच्या जवळ गेला. कागदपत्रे खाली ठेवताच त्याने गुप्ता यांचा हात धरून त्यांना ओढले आणि कानशीलात वाजवली. यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. कार्यकर्ते आणि त्या इसमामध्ये धक्काबुक्की झाली. धक्काबुक्की सुरू असताना रेखा गुप्ता यांना धक्का लागल्याने त्यांचे डोकं एका टेबलावर आदळलं.
तेथे उपस्थित असलेले कार्यकर्त्यांनी आरोपीला पकडून मुख्यमंत्री आवासातील पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव राजेश भाई खिमजी असे आहे. हा गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी आहे. राजेश त्याच्या तुरूंगात असलेल्या नातेवाईकाला सोडवण्याच्या प्रयत्नात आहे. याच संदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळावी यासाठी तो त्यांना भेटायला गेला होता.
आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…
२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…
आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…
मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…
"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…
भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…