Random News

Crime Story : ‘ती’ ट्यूशनला गेली आणि तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाली !

Teacher Killed student crime news : २० दिवसांपूर्वी म्हणजे २८ ऑगस्टला मुलगी घरून ट्यूशनसाठी गेली. पण, ती परत आलीच नाही. आईवडिलांनी चौकशी केली, तेव्हा ती ट्यूशनलाही आली नसल्याचे कळले. मग सुरु झाला पोलीस तपास. पोलिसांनी शोध सुरू केला आणि तिचे तुकडे तुकडे तपासाअंती समोर आले. घरातून बाहेर पडलेल्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडेच घरी आले. मुलीची हत्या शिक्षकानेच केल्याचे तपासात आढळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Rahul Gandhi PC: VoteChoriचा पुन्हा तगादा! राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
Causes of Cancer : कॅन्सर नेमका कशामुळे होतो ? ‘या’ गोष्टी आहेत महत्त्वाच्या ! जाणून घ्या

ही घटना आहे पश्चिम बंगालमधील बीरभूमी जिल्ह्यातील. हत्या करण्यात आलेली मुलगी रामपूरहाट परिसरात आईवडिलांसोबत राहते. श्यामपहाडी येथील शाळेत ती शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर ती घरी यायची आणि नंतर ट्यूशनला जात होती. २८ ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ती ट्यूशनसाठी घरातून बाहेर पडली होती. पण, परत आलीच नाही.

काय आहे घटना

मागील २० दिवसांपासून मुलगी बेपत्ता होती. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. तेव्हा शाळेतीलच मनोज कुमार पाल या शिक्षकाने तिचे अपहरण केल्याचे तपासातून समोर आले. पोलिसांनी लगेच शिक्षकाला अटक केली.

UPI Cash Withdrawal : ATM शिवाय आता काढता येणार कॅश ! Smartphoneनेच मिळणार १० हजार रुपये !

पोलिसांनी शिक्षकाची चौकशी करत असतानाच पोलिसांकडून तिचा शोधही सुरू होता. रामपूरहाटमधीलच कालीडांगा गावात असलेल्या एका तलावात मृतदेहाचे तुकडे आढळून आले. हे तुकडे बेपत्ता विद्यार्थिनीचेच असल्याचे निष्पन्न झाले. अनेक दिवसांपूर्वी हत्या करून तुकडे पाण्यात फेकले गेले होते. त्यामुळे ते सडू लागले होते. शिक्षकाने मुलीची हत्या का केली आणि हत्या करण्यापूर्वी तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते का? याचाही तपास पोलीस करत आहे. मृतदेहाचे तुकडे सडलेले असल्याने तपासणी करण्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

17 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

17 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago