७० एकरांचं जंगल: दुशार्ला सत्यनारायण यांच्या जिद्दीची कहाणी!
“जंगल” म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं हिरवाईने नटलेलं, पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेलं, विविध प्रजातींच्या जीवसृष्टीने समृद्ध असलेलं एक नैसर्गिक विश्व. आज जगभरात शहरांचा विस्तार, औद्योगीकरण आणि अनियंत्रित जंगलतोडीमुळे निसर्गाचं हे विश्व दिवसेंदिवस संकुचित होत चाललंय. पण या काळोखात आशेचा किरण बनून अशा काही व्यक्ती उभ्या आहेत ज्यांनी स्वकष्टाने जंगले उभी केली त्यांतील एक म्हणजे तेलंगणातील…
