News

बाल्कनीत बुलेटप्रुफ काच… सलमानने केला खुलासा

बॉलिवूडच्या तीन खान पैकी एक भाईजान कायमच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे. ईद असो किंवा त्याचा वाढदिवस असो, तो आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी बाल्कनीत येऊन उभा राहत असे. गेल्या ईदला चाहत्यांना शुभेच्छा देण्याकरीता बाल्कनीत आला पण तो बुलेटप्रुफ काचेमागे उभा होता. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले होते. मात्र आता सलमानने बुलेटप्रुफ काच का लावली याबाबत खुलासा केला आहे.

याबाबत आता सलमानने बाल्कनीला बुलेटप्रुफ लावण्यामागचे कारण इतर कोणत्याही कारणासाठी नसून त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्याने खुलासा केला की, चाहते भेटायला आल्यानंतर उत्साहाच्या भरात ते कधी कधी वर चढून बाल्कनीत यायचे. एकदा एक चाहता चक्क सकाळी बाल्कनीत झोपलेला आढळला, त्यामुळे इथे काच लावली असल्याचे सलमानने सांगितले.

काही महिन्यांपूर्वीच सलमानला व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अज्ञात व्यक्तिने गाडीत बॉम्ब ठेवून उडवून टाकण्याची धमकी दिली. त्यासोबत लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून देखील त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. गेल्यावर्षी त्याच्या वांद्रे येथील निवासस्थान गॅलेक्सीवर गोळीबार करण्यात आला होता. बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोलने घरावर केलेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. याच दरम्यान सलमानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांचीही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Team Jabari Khabari

Recent Posts

“मूलांना जन्म द्या सबसिडी मिळवा” चीनचे नवे धोरण

चीनची वन चाइल्ड पॉलिसी हे जगातील चर्चेचा विषय ठरलेले धोरण होते. मात्र या धोरणाचे दुष्परिणाम…

1 day ago

Malegaon Blast: 17 वर्षांनंतर अखेर भगवाचं जिकंला! स्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची विशेष एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली…

2 days ago

ट्रम्प यांनी भारतावर लादले कठोर टॅरिफ! रशियासोबत व्यवहाराचा फटका?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लावण्याचा…

2 days ago

Mahadevi Elephant : महादेवीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर; गावकऱ्यांचा हत्तीणीला निरोप

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील नांदणी गावात स्थित असलेले स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात…

3 days ago

जय जवान पथक प्रो गोविंदातून बाहेर? नेमकं काय घडलं… वाचा सविस्तर

दहीहंडी दिवशी दहा थरांचा विक्रम रचून केवळ महाराष्ट्रचं नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण…

4 days ago

UPI वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी – 1 ऑगस्टपासून व्यवहारामध्ये नवे बदल

वापरकर्त्यांना UPI अॅप्सच्या वापरामध्ये थोडा बदल जाणवेल. कारण युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून…

4 days ago