Random News

बदलापूर–पनवेल रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील; चौथ्या मुंबईचं स्वप्न आता रुळांवर!

कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, खोपोली आणि नेरळ यांसारख्या शहारांचा वेगाने विकास होत असून, या परिसराला आता ‘चौथी मुंबई’ म्हणून ओळख मिळू लागली आहे. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र मुंबईला जाण्यासाठी सध्या कल्याण-ठाणे हा एकमेव मार्ग असल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढत चालली आहे. कल्याण डोंबिवली आणि ठाणे स्थानकांवरील प्रवासी भारामुळे प्रवास करताना लोकांची तारेवरची कसरत होत आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बदलापूर (कासगाव) – पनवेल मार्गे नवी मुंबई(कामोठे) असा सुमारे 34 किलोमीटर लांबीचा नवा रेल्वे मार्ग उभारण्याची योजना करण्यात आली आहे. या मार्गामुळे बदलापूर, कर्जत, अंबरनाथ परिसरातील प्रवाशांना थेट नवी मुंबई गाठणे सोपे होईल आणि कल्याण ठाणे मार्गिकांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.

बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या प्रस्तावित मार्गासाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती. नितीन गडकरी यांनी या मागणीचे महत्व लक्षात घेऊन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले. या पत्राची दखल घेत रेल्वे प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली. रेल्वे मंत्रालच्या निर्देशानुसार, बांधकाम आणि सर्वेक्षण विभागाने मागील वर्षापासूनच सर्वेक्षण सुरू केले आहे. कासगाव येथे नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

या मार्गामुळे गर्दीचे विकेंद्रीकरण होईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. याशिवाय, कल्याण-कळवा मार्गे वाशी रेल्वे सुरू करता येईल.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

20 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

20 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago