Random News

हिंदुत्वाचे धडे: संस्कारांची नवीन पहाट

आज आपल्या देशात शिक्षण हे ज्ञान देण्याचे साधन न राहता एक व्यवसाय बनत चालले आहे. विद्यार्जन म्हणजे केवळ गुण मिळविणे किंवा करिअर घडविणे एवढ्यावरच सिमित झाले आहे. अशा परिस्थितीत संस्कार, मूल्ये आणि आपल्या परंपरेची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचणार? जर मुलांना योग्य ज्ञानच मिळाले नाही, तर त्यांच्या मनात संस्कारांची जागा कशी निर्माण होणार? याच कारणामुळे आपला देश आणि आपला हिंदू धर्म मागे पडत असल्याची खंत वाटते.

आपल्या प्रथा-परंपरा, रितीरिवाज, आणि सनातन धर्माचे असंख्य पैलू, जर पुढील पिढीपर्यंत पोहोचले नाहीत तर त्यांची ओळख आपोआप क्षीण होईल. म्हणूनच धार्मिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक भारतीय कुटुंबात हिंदू धर्माचे मूलभूत ज्ञान पोहोचायला हवे. ज्या प्रकारे इतर धर्मांमध्ये धार्मिक शिक्षण अनिवार्य असते, तसेच हिंदू धर्माच्या बाबतीत का नसावे? हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोच ना?

यासाठी केंद्र सरकार, विविध राज्यांतील सामाजिक संस्था, पत्रकार, समाजसेवक, साहित्यिक, कलाकार या सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या प्राचीन संस्कृतीचे आणि धर्माचे ज्ञान नसेल, तर आपली वैचारिक आणि सांस्कृतिक उन्नती कशी होणार?

आपली शास्त्रं आपल्याला जगण्याची दिशा दाखवतात. मग प्राथमिक शिक्षणासोबत सनातन धर्माचा अभ्यास का करू नये? या ध्येयाने एखाद्या समर्पित व्यक्तीने पुढाकार घेऊन लोकांसमोर हा विचार प्रभावीपणे मांडायला हवा. देशातील प्रत्येक भागात धार्मिक शिक्षणाचे वर्ग सुरू व्हावेत. दररोज किमान दोन तास तरी विद्यार्थ्यांना हिंदू धर्माचे मूळ तत्त्वज्ञान शिकण्याची संधी मिळायला हवी.

आजच्या काळात क्षुल्लक किंवा निरर्थक गोष्टींना लोक सहज आकर्षित होतात, पण कोणी चांगले विचार मांडले तर त्याकडे दुर्लक्ष होते. हेही आपले अज्ञानच आहे. जर आपल्याला धर्माचे योग्य ज्ञान मिळाले असते, तर भविष्यात कोणत्याही चुकीच्या निर्णयाकडे जाण्याची वेळ येणार नाही.

म्हणून जे काही गमावले आहे ते गंगेला मिळाले समजून, आता तरी देशातील शाळांमध्ये हिंदुत्वाचे धडे शिकवण्याबाबत गंभीरपणे विचार झाला पाहिजे. आमचा हा विचार इतरांपर्यंतही पोहोचवू या आणि देशाला समग्र सनातन ज्ञान, संस्कार आणि मूल्यांनी समृद्ध करूया!

कारण
धर्मो रक्षति रक्षितः
अर्थात तुम्ही धर्माचे रक्षण करा, धर्म तुमचे रक्षण करील!

चला… हिंदुत्वाचे नवे धडे पुन्हा गिरवू या!

जय श्रीराम!

 

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

16 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

16 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago