Categories: Lifestyle

मायोंग: काळी जादू करणारं मायावी गाव

आसाममधील मायोंग हे गाव भारताची ‘काळ्या जादूची राजधानी’ म्हणून ओळखले जाते. या गावाची कहाणी अगदी रहस्यमय, अविश्वसनीय आणि लोकांच्या कल्पनाशक्तीला भुरळ घालणारी आहे. अशा या थरारक कथेबद्दल जाणून घेणे आणि प्रत्यक्षात अनुभवणे याकडे हल्लीच्या पिढीचा जास्त कल असतो, असे अनेकदा दिसून येते. याच अनुषंगाने लिहिलेला हा ब्लॉग आहे.

‘मायोंग’हे नाव संस्कृतमधील ‘माया’ या शब्दावरून आल्याचे मानले जाते, ज्याचा अर्थ भ्रम किंवा जादू असा होतो. हे गाव प्राचीन काळापासून तांत्रिक साधनेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. तिथे आजही मंत्र-तंत्र आणि जादूटोण्याची अतिप्राचीन परंपरा जपल्या जातात. आणि म्हणूनच या गावाशी संबंधित काही आश्चर्यचकित करणाऱ्या कहाण्या वेळोवेळी समोर येत असतात, जसं की माणसे अचानक गायब होणं किंवा माणसं प्राणी बनणं. अशा अनेक कथा आजही स्थानिक लोक सांगतात, तसेच सोशल मीडियावरही व्हायरल होतात.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, महाभारतातील राक्षस हिडिंबा आणि भीमाचा मुलगा घटोत्कच हे याच गावचे होते. येथे १३३० च्या दशकात एक विचित्र घटना घडली होती. असे म्हटले जाते की तत्कालीन मुघल शासक मुहम्मद बिन तुघलकचे तब्बल एक लाख सैनिक या गावाजवळील जंगलात गायब झाले होते, जे कधीच सापडले नाहीत. औरंगजेबच्या काळातील ‘अलंजीरनामा’ या वृत्तांतात… दरबारी इतिहासकार मिर्झा मुहम्मद काझिम याने असे लिहिले आहे की, जेव्हा त्याने आसाममधील अहोम राज्याचा पराभव केला तेव्हा वीर राम सिंह अहोम सैन्यापेक्षा मायोंगच्या काळ्या जादूची भीती बाळगत होता. तिथे अनेक ज्योतिषी आहेत जे हाताच्या रेषा वाचून आपले भविष्य सांगतात. तेथील वैद्य आजार दूर करण्यासाठी औषधांचा नाही, तर आत्मे आणि भुतांची मदत घेतात.

भौगोलिकदृष्ट्या पाहता, मायोंग हे गाव गुवाहाटीपासून सुमारे ४० किमी अंतरावर, पोबितोरा अभयारण्याजवळ वसलेले आहे. येथे असामी लोकसंस्कृती, नृत्यपरंपरा आणि काळ्या जादूशी संबंधीत स्थानिक परंपरा आजही टिकून आहेत.

 

Team Jabari Khabari

Share
Published by
Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

15 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

15 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

1 day ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago