8th Pay Commission
खाजगी नोकरदार असो नाहीतर सरकारी, पगारवाढीची वाट सगळेच बघतात कारण महिन्याच्या शेवटी प्रत्येकालाच चणचण जाणवते. पण आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारने आठव्या आयोगाचं गिफ्ट दिलंय. ज्यामुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांच्या वेतन आणि निवृत्तीवेतनामध्ये वाढ होणार आहे.
याच्याआधीचा म्हणजे सातवा वेतन आयोग हा २०१६ साली लागू करण्यात आला होता. ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठी सुधारणा झाली होती. बेसिक पे 2.57 पट वाढवण्यात आला होता, तर महागाई भत्ता (DA) आणि गृहभाडे भत्ता (HRA) यामध्येही लक्षणीय वाढ झालेली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला मोठा हातभार लागला होता.
त्यानंतर सर्वच जण या आठव्या वेतन आयोगाची वाट बघत होते. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावेल. नवीन पगाररचना कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य मिळवून देईल. याशिवाय, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची कामगिरी आणि समाधान वाढण्याची शक्यता आहे. हा विश्वास सर्वाना होता. आणि आता तो आठवा वेतन आयोग लागू झाला आहे.
या आठव्या वेतन आयोगाच्या recommendation नुसार Basic Payment हे १८००० रुपयांवरून थेट ३४,५०० रुपये होणार आहे. या पगार वाढीमुळे लोकांना घर, शिक्षण आणि आरोग्य या संदर्भात ज्या आर्थिक अडचणी यायच्या त्या कमी होतील, त्यामुळे ही पगार वाढ अनेकांसाठी नक्कीच दिलासादायक असणार आहे. या आठव्या वेतन आयोगाचे इतके सगळे फायदे असले तरीही ही पगारवाढ काही लगेच होणार नाहीये. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबद्दल अधिकृत अधिसूचना आणि तपशीलवार माहिती लवकरच जाहीर केली जाईल आणि त्यानंतर म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून त्याची अंमलबजावणी होईल असं सरकार कडून सांगण्यात आलं आहे. तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि…
सध्या सर्वत्र विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची चर्चा रंगली आहे. या सिनेमात मराठी आणि हिंदी कलाकारांची…
आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी, प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा अंतिम शाही स्नान सोहळा अत्यंत उत्साहात…
मुंबईतील रंगभूमीचा एक अनमोल ठेवा – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता नूतनीकरणानंतर नव्या…
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भोकणी गावाने पर्यावरण रक्षणासाठी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. 'प्लास्टिक…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी गावात प्रथमच 'पिंगुळी लोककला महोत्सव २०२५' रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य…