Random News

लवकरच लागू होणार आठवा वेतन आयोग

खाजगी नोकरदार असो नाहीतर सरकारी, पगारवाढीची वाट सगळेच बघतात कारण महिन्याच्या शेवटी प्रत्येकालाच चणचण जाणवते. पण आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारने आठव्या आयोगाचं गिफ्ट दिलंय.  ज्यामुळे सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांच्या वेतन आणि निवृत्तीवेतनामध्ये वाढ होणार आहे.

याच्याआधीचा म्हणजे सातवा वेतन आयोग हा २०१६ साली लागू करण्यात आला होता. ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत मोठी सुधारणा झाली होती. बेसिक पे 2.57 पट वाढवण्यात आला होता, तर महागाई भत्ता (DA) आणि गृहभाडे भत्ता (HRA) यामध्येही लक्षणीय वाढ झालेली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला मोठा हातभार लागला होता.

त्यानंतर सर्वच जण या आठव्या वेतन आयोगाची वाट बघत होते. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावेल. नवीन पगाररचना कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक स्थैर्य मिळवून देईल. याशिवाय, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची कामगिरी आणि समाधान वाढण्याची शक्यता आहे. हा विश्वास सर्वाना होता. आणि आता तो आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. 

या आठव्या वेतन आयोगाच्या recommendation नुसार Basic Payment हे १८००० रुपयांवरून थेट ३४,५०० रुपये होणार आहे. या पगार वाढीमुळे लोकांना घर, शिक्षण आणि आरोग्य या संदर्भात ज्या आर्थिक अडचणी यायच्या त्या कमी होतील, त्यामुळे ही पगार वाढ अनेकांसाठी नक्कीच दिलासादायक असणार आहे. या आठव्या वेतन आयोगाचे इतके सगळे फायदे असले तरीही ही पगारवाढ काही लगेच होणार नाहीये. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबद्दल अधिकृत अधिसूचना आणि तपशीलवार माहिती लवकरच जाहीर केली जाईल आणि त्यानंतर म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून त्याची अंमलबजावणी होईल असं सरकार कडून सांगण्यात आलं आहे. तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

Admin

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

22 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

22 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago