Random News

Independence Day: 18 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्यदिन? वाचा सविस्तर

भारताचा स्वातंत्र्य दिन भारतातीलच काही भागांमध्ये 18 ऑगस्टला साजरा केला जातो. ऐकून धक्का बसला ना? पण हे खरं आहे..

ही गोष्ट आहे 1947 च्या फाळणीनंतरची (1947 Partition)… ब्रिटिश वकील व्हिस्काउंट सिरिल रॅडक्लिफ यांनी भारत-पाकिस्तान सीमा निश्चित केल्या. सुरुवातीच्या मॅपनुसार पश्चिम बंगालमधील नादिया आणि मुर्शिदाबादचे हिंदू मेजॉरिटी असणारे भाग पूर्व पाकिस्तानात गेलेले.

पण नादियातील लोकांना भारतातच राहायचं होतं.

त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि थेट व्हाइसरॉय माउंटबॅटन (Lord Mountbatten) यांना लेटर पाठवलं.

आणि 17 ऑगस्ट, 1947 च्या संध्याकाळी, भारतातील काही जिल्ह्यांची अदलाबदल होणार आहे अशी ऑल इंडिया रेडिओ (All India Radio) वर घोषणा करण्यात आली. त्यानुसार नादिया हे स्वतंत्र भारतात परत समाविष्ट करण्यात आले.

दुसऱ्याच दिवशी, 18 ऑगस्टला, कृष्णनगरच्या जिल्हा मुख्यालयात लावलेला पाकिस्तानचा झेंडा उतरवून भारतीय तिरंगा फडकवण्यात आला!

अर्थात काही काळाने या भागात 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन अधिकृतरित्या साजरा करण्यात येऊ लागला.

पण 1991 मध्ये, इतिहासकार अंजन सुकुल यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडे 18 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची परवानगी मागितली.

आणि 18 ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्य दिन’ पुन्हा साजरा करण्यास सुरुवात झाली.

18 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त या जिल्ह्यात मिरवणुका, भांगडा नृत्य, डॉग शो, आणि चूर्णी नदीवर बोट रेसिंग असे कार्यक्रम तिथे आयोजित केले जातात.

Team Jabari Khabari

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

20 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

20 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago