इतकी आग…. इतकं नुकसान…

लॉस एंजिलीस मधील वणव्याचे रील्स, WhatsApp videos एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच, पण नेमकं हे सगळ काय चालू आहे? आणि याची सुरवात कुठून झाली?

जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी 7 जानेवारी रोजी सकाळी सर्वांत आधी पॅसिफीक पॅलिसेड्समधून सुरू झाली. हा परिसर लॉस एंजेलिसच्या वायव्य भागात येतो. 

मात्र फक्त १० एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्येच 2900 एकरच्या परिसरामध्ये पसरली.  “एखादा बॉम्ब शहरावर पडलाय असं वाटतंय या शब्दात येथील अधिकाऱ्यांनी या आगेचं वर्णन केलं आहे. या आगेला आटोक्यात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले तरीही आग आटोक्यात आणता आलेली नाही.  आत्तापर्यंत अंदाजे १५ पेक्षा जास्त लोकांचा  या आगेत मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना बेघर व्हावं लागलेलं आहे. 

कॅलीफोर्निया सारख्या अतिशय सुंदर राज्यातील अतिशय श्रीमंत, उच्चभ्रू समजला जाणारा हा भाग आणि येथील महागडी घरं काही क्षणात बेचिराख झाली आहेत. या वणव्यात आत्तापर्यंत २५० ते २७५ अब्ज डॉलरचं नुकसान झालेलं आहे. जोरदार वाहणारं वारं आणि कोरड्या वातावरणामुळे मदत आणि बचाव कार्यातही बऱ्याच अडचणी येत आहेत. बहुतांश ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवणं जवळपास अशक्य झालं आहे.

आग विझवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमन दलाला अतिरिक्त उपकरणं उपलब्ध करून देण्याच्या सूचना राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन लष्कराला दिल्या आहेत.

राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले, “या आगीला सामोरं जाण्याकरिता आम्ही काहीही करण्यासाठी तयार आहोत. लोकांचं आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल. मात्र, त्यासाठी थोडा अधिक वेळ लागेल. आम्ही हे काम करत आहोत.”

“आग विझवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अग्निशमन दलालाही आता पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. लोकांना पाणी वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आग विझवण्यासाठी पाण्याचा अतिवापर करण्यात आल्यास लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो.”

ही आग आता कॅलिफोर्नियामधून हॉलिवूड हिल्सपर्यंत पसरली आहे. हॉलिवूडमधील अनेक फिल्म स्टार्सची घरेही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नेस्तनाबूत झाली आहेत. hollywood चं जगप्रसिद्ध sign सुद्धा या आगेपासून वाचू शकलेलं नाहीये.

इतक्या मोठ्या प्रमाणात ही आग का पसरली याचा अनेक जण अभ्यास करत आहेत तरी वरकरणी जोरदार वाहणारी हवा आणि पावसाचा अभाव या दोन मुख्य कारणांमुळे हा वणवा इतक्या मोठ्या प्रमाणात भडकल्याचं सांगितलं जात आहे. याच्यासोबतच जागतिक तापमान वाढीचा परिणाम देखील या घटनेवर दिसून आला आहे. 

आग वणवा पेटून आता जवळ जवळ दहा दिवस ओलांडले असूनही आग आटोक्यात न आल्याने सर्वत्र चिंतेचं वातवरण आहे. ही आग कधी आटोक्यात येईल याच्याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून आहे.

Admin

Recent Posts

सामान्यांचे हजारो कोटी रुपये घेऊन महावितरणचा ‘व्हीलिंग चार्जेस’ घोटाळा

आपण दरमहा वीज बिल भरतो, पण त्यातील प्रत्येक आकड्याचा अर्थ आपल्याला माहित असतो का? वीज…

18 hours ago

आसाम, बंगाल ते दक्षिण भारत विधानसभा निवडणुका २०२६… देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लढत

२०२६ जसं चालू झालं, तसं एकूणच देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने रोमांचक लढत घेऊन आलं. मुंबई महानगरपालिका…

18 hours ago

Reko Diq Project – तांबे आणि सोन्याच्या जागतिक बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी अमेरिकेची खेळी

आज जगातील सर्वच बलाढ्य देश आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र आहे. आर्थिक…

2 days ago

मणिपूर: एका विजनवासाचा अंत की संघर्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात?

मणिपूर, भारताच्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर्स पैकी एक भौगोलिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत राज्य. जिथे एकेकाळी निसर्गाचे…

2 days ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांमध्ये का असंतोष आहे?

"वन विभाग आम्हाला अतिक्रमणदार म्हणतो. पण आम्ही आदिवासी मूळनिवासी आहोत. आमची जमीन, शेती, देव-धर्म सगळं…

4 days ago

संसदेत मोदींवर हल्ला करण्याचा कट होता का?

भारतीय लोकशाहीचं मंदिर असलेल्या संसदेत गेल्या काही दिवसांपासून फारच गोंधळ चालू आहे. राहुल गांधी यांनी…

5 days ago